शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
2
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
3
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
4
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
5
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
6
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
7
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
10
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
11
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
12
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
13
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
14
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
15
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
16
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
17
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
18
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
19
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
20
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या प्रकल्पात फक्त ६.५० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 23:51 IST

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्प बंधाऱ्यांत फक्त ६.५० टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.

ठळक मुद्देटँकरचा आकडा दीड हजारांवर: २५ लाख लोकांना टँकरचे पाणी, बंधारे आटले

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघुप्रकल्प बंधाऱ्यांत फक्त ६.५० टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ६.५३ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ५.९५ टक्के, तर ७४९ लघु प्रकल्पांत ५.७४ टक्के पाणीसाठा आहे. १३ बंधाऱ्यांत १३.२० टक्के, तर उर्वरित इतर २४ बंधारे आटले आहेत. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासन नियोजन करण्याचे प्रयत्न करीत आहे.कधी नव्हे एवढे टँकर मार्च महिन्याच्या सुरुवातीला विभागात सुरू असून १५३९ टँकरने आठ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आहे. येणाºया आठ दिवसांत १६०० च्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार १७६ गावांत, ३७६ वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे.विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १२ लाख २ हजार ६८७ नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. २०८६ विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत.बीड जिल्ह्यात ६ लाख ८९ हजार ३७६ नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ६२७ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ४ लाख ६१ हजार ४९३ गावांना टँकरचे पाणी दिले जात आहे. ३३३ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. सध्या १४७० टँकर खाजगी कंत्राटदार संस्थांचे असून उर्वरित ६९ टँकर शासकीय आहेत. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबीवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागते आहे. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी आगामी काळात ती वाढण्याची शक्यता आहे.जिल्हा लोकसंख्या टँकरऔरंगाबाद १२ लाख ३ हजार ७५६जालना ४ लाख ६१ हजार २५२परभणी ७ हजार ४३८ ०३हिंगोली २० हजार ९०९ १३नांदेड ५३ हजार ९५९ २८बीड ६ हजार ८९ हजार ४४०लातूर १० हजार ४४० ०२उस्मानाबाद ९२ हजार ७९३ ४५एकूण २५ लाख १५३९मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थितीप्रकल्प संख्या पाणीसाठामोठे ११ ६.५३ टक्केमध्यम ७५ ५.९५ टक्केलघु ७४९ ५.७४ टक्केबंधारे १३ १३.२० टक्केइ.बंधारे २४ ००.०० टक्केएकूण ८७२ ६.५० टक्के 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMarathwadaमराठवाडा