शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

मराठवाड्यात झाला फक्त ४८ दिवसच पाऊस; ७२ दिवस कोरडे गेल्याने विभागातील चार जिल्ह्यांत टंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:11 IST

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यातील १९ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.मराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे.

मराठवाडा : मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८६.३६ टक्के  पाऊस झाला आहे.

विभागामध्ये पावसाळ्यात कोरडे दिवसच जास्त गेले. जून महिन्यात १७ दिवस पाऊस झाल्याने बहुतांश शेतक-यांनी पेरण्या केल्या; मात्र जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. जुलैमध्ये केवळ ९ दिवस पाऊस झाला. जुलैत पावसाने दडी मारल्यामुळे औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी १२ दिवस पाऊस झाल्याचे प्रमाण येते. या पावसामुळे खरिपातील शिल्लक राहिलेल्या पिकांनी तग धरला, तर बीड, लातूर,  उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातील अति पावसामुळे पिकांना फटका बसला.

गेल्या वर्षी पावसाने सरासरी ओलांडली होती. यंदा सरासरीपर्यंतही काही जिल्ह्यांत पाऊस झाला नाही. परतीच्या पावसावर मदार असलेल्या मराठवाड्यात आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. ८ ते १३ आॅक्टोबरदरम्यान पाऊस झाला. या कालावधीत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला होता. औरंगाबाद जिल्ह्यात ८३.४९, परभणी ६९.१३, हिंगोली ७२.७०, नांदेड ६५.५८, बीड १०५.४७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०९.१५ टक्के पाऊस झाला आहे, तर जालना जिल्ह्यात ९८.२१ टक्के पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही सरासरीपर्यंत पावसाने हजेरी लावली.

१९ तालुक्यांत कमी पाऊस

मराठवाड्यातील १९ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह इतर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, ३१ आॅक्टोबरनंतर टंचाई आराखड्यावर काम सुरू होणार आहे. परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे, तर १९ तालुक्यांमध्ये त्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावणे अपेक्षित होते; परंतु अपेक्षित पाऊस झाला नाही. 

टॅग्स :Rainपाऊस