शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

मराठवाड्यात झाला फक्त ४८ दिवसच पाऊस; ७२ दिवस कोरडे गेल्याने विभागातील चार जिल्ह्यांत टंचाईची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 13:11 IST

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यातील १९ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे.मराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे.

मराठवाडा : मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८६.३६ टक्के  पाऊस झाला आहे.

विभागामध्ये पावसाळ्यात कोरडे दिवसच जास्त गेले. जून महिन्यात १७ दिवस पाऊस झाल्याने बहुतांश शेतक-यांनी पेरण्या केल्या; मात्र जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले. जुलैमध्ये केवळ ९ दिवस पाऊस झाला. जुलैत पावसाने दडी मारल्यामुळे औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यामधील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी १२ दिवस पाऊस झाल्याचे प्रमाण येते. या पावसामुळे खरिपातील शिल्लक राहिलेल्या पिकांनी तग धरला, तर बीड, लातूर,  उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यातील अति पावसामुळे पिकांना फटका बसला.

गेल्या वर्षी पावसाने सरासरी ओलांडली होती. यंदा सरासरीपर्यंतही काही जिल्ह्यांत पाऊस झाला नाही. परतीच्या पावसावर मदार असलेल्या मराठवाड्यात आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. ८ ते १३ आॅक्टोबरदरम्यान पाऊस झाला. या कालावधीत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला होता. औरंगाबाद जिल्ह्यात ८३.४९, परभणी ६९.१३, हिंगोली ७२.७०, नांदेड ६५.५८, बीड १०५.४७, तर उस्मानाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०९.१५ टक्के पाऊस झाला आहे, तर जालना जिल्ह्यात ९८.२१ टक्के पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही सरासरीपर्यंत पावसाने हजेरी लावली.

१९ तालुक्यांत कमी पाऊस

मराठवाड्यातील १९ तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह इतर टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, ३१ आॅक्टोबरनंतर टंचाई आराखड्यावर काम सुरू होणार आहे. परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ३२ तालुक्यांत ७० ते ८० मि.मी.च्या आत पाऊस झाला आहे, तर १९ तालुक्यांमध्ये त्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावणे अपेक्षित होते; परंतु अपेक्षित पाऊस झाला नाही. 

टॅग्स :Rainपाऊस