शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यात केवळ २५ मि़मी़ पाऊस

By admin | Updated: June 24, 2014 00:39 IST

नांदेड : जिल्ह्यात पावसाचे आगमन न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाला असून २४ दिवसात केवळ २५़३३ मि़मी़ पाऊस झाला आहे़ पावसाची ही टक्केवारी केवळ अडीच टक्के आहे़

नांदेड : जिल्ह्यात पावसाचे आगमन न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाला असून २४ दिवसात केवळ २५़३३ मि़मी़ पाऊस झाला आहे़ पावसाची ही टक्केवारी केवळ अडीच टक्के आहे़ गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १४५़८१ मि़मी़ पावसाची नोंद झाली होती़ पाऊस न झाल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून पेरण्याही खोळंबल्या आहेत़जिल्ह्यात सरासरी ९५५़५५ मि़मी़ पाऊस होतो़ गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता़ यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे़ जिल्ह्यात जवळपास ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे़ आहेत़ या क्षेत्रात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़ तुरळक ठिकाणी धुळपेरणी शेतकऱ्यांनी उरकली आहे़ जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्नही ऐरणीवर आला आहे़ शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणांची खरेदी करून ठेवली आहे़ उसनवारीवर शेतकऱ्यांनी खरेदी केली असली तरी पाऊसच होत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे़ पेरण्या लांबल्याने उत्पन्नावरही परिणाम होणार असल्याने बळीराजाच्या चिंतेत भरच पडली आहे़पाऊस लांबल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रताही वाढत चालली आहे़ जिल्ह्यात २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे़ त्यात मुखेड तालुक्यातील पिंपळकुंठा अ़, वाल्मिकनगर, विठ्ठलवाडी, कोळगाव, खैरका, बावनवाडीअंतर्गत सोनपेठ वाडी तांडा व जुना अंतर्गत मानसिंग व लखुतांडा, शिरूरअंतर्गत हरिश्चंद्रतांडा, सीतारामतांडा व फत्तुतांडा, देवीनगर-प्रभुनगरतांडा, भवानीनगरतांडा, यशवंतनगरतांडा, लोहा तालुक्यातील मडकी, शेवडी बा.तांडा, उमरा अ़ फुलवळतांडा, परसरामतांडा, रूपसिंगतांडा, उमरा नवी आबादी, कंधार तालुक्यातील उस्माननगर, हरीला तांडा, भोकर तालुक्यातील कामनगाव, किनवट तालुक्यातील मारेगाव, रामपूर-भामपूर आणि हिमायतनगरचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यातजिल्ह्यात १ जून ते २४ जूनपर्यंतची पावसाची नोंद पाहता धर्माबाद तालुक्यात सर्वाधिक ६६ मि़मी़ पाऊस झाला आहे़ नांदेड तालुक्यात १०़६२ मि़मी़, मुदखेड ८़६६, अर्धापूर ४, भोकर ३५़९५, उमरी १३़३७, कंधार ४५़६६, लोहा २७़१७, किनवट २७़८६, माहूर २५़५०, हदगाव ८़४९, हिमायतनगर १०़३४, देगलूर २६़१८, बिलोली २५, नायगाव १९़८० मि़मी़ आणि मुखेड तालुक्यात ५०़७२ मि़मी़ पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस हा ४०५़३२ मि़मी़ असून तो सरासरीत २५़३३ मि़मी़ आहे़ या पावसाची टक्केवारी ही केवळ २़६५ टक्के आहे़