शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये फक्त २२ दलघमी पाणी

By admin | Updated: June 9, 2016 23:54 IST

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या शेवटी मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती खूपच भीषण झाली आहे. विभागातील मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ २२ दलघमी इतकाच जिवंत साठा शिल्लक आहे.

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या शेवटी मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती खूपच भीषण झाली आहे. विभागातील मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ २२ दलघमी इतकाच जिवंत साठा शिल्लक आहे. जायकवाडीसह इतर आठ मोठ्या धरणांमधील जिवंत साठा केव्हाच संपला असून, आता या धरणांमधील मृतसाठ्यातील पाण्यावरच विभागातील अनेक शहरांची तहान भागविली जात आहे.मराठवाड्यात मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे विभागातील धरणांमध्ये पुरेसा साठा होऊ शकला नव्हता. परिणामी यंदा जानेवारीपासून पाणीटंचाईचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण यंदा २६ मार्च रोजीच मृतसाठ्यात गेले. तेव्हापासून या धरणातील मृतसाठ्यातून औरंगाबाद, जालना, गेवराई आदी प्रमुख शहरांसह सुमारे अडीचशे गावांची तहान भागविली जात आहे. तसेच औद्योगिक वसाहतींसाठी मृतसाठ्यातूनच पाणी वापर सुरू आहे. दुसरीकडे येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न मनार, विष्णूपुरी या धरणांमधील जिवंत साठा संपला आहे. सध्या केवळ निम्न दुधना आणि पेनगंगा या दोन धरणांच्या जिवंत साठ्यात अवघे २२ दलघमी एवढे पाणी शिल्लक आहे. आठवडाभरात हे पाणीही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणांमधील जिवंत साठा शून्यावर येणार आहे. दरम्यान, मृतसाठ्यातून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वापर झाला आहे. एकट्या जायकवाडी धरणातून आतापर्यंत सुमारे २२८ दलघमी पाणी उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात आधी मृतसाठ्याची पातळी भरून जिवंत साठ्यात पाणी साचण्यासाठी बराच अवधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.