शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

फक्त २ लाख वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:43 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली

स.सो. खंडाळकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली. मराठवाड्यातील ४० लाख शालेय मुला-मुलींनी प्रत्येकी एक झाड या हिशेबाने ४० लाख झाडे लावावीत, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या संख्येकडून १ लाख ९० हजार एवढी कमी झाडे लावली गेली. ही एक शोकांतिकाच मानली जात आहे, हीच गत जलसंपदा विभागाची झाली. कालव्याच्या बाजूने वा अन्यत्र फार मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची अपेक्षा असताना जलसंपदा विभागाने मात्र वृक्ष लागवडीकडे पाठ फिरविली. त्यांना झाडे लावण्याचा कार्यक्रम अजिबात महत्त्वाचा वाटला नाही.आता आव्हान उभे ठाकणार आहे, ते लावलेली झाडे जगवण्याचे! सुमारे ५० ते ६० टक्के झाडे वन विभाग व सामाजिक वनीकरणाने जगवावीत, हे गृहीतच आहे. याशिवाय वृक्षसंवर्धनासाठीच पुढे आलेल्या ग्रीन आर्मीच्या १२ लाख १३ हजार सदस्यांकडून वृक्षसंवर्धन केले जाईल. मनरेगामधूनही ही झाडे जगवली जाणार आहेत. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांनी संवर्धनाची काळजी घ्यावी, असे अपेक्षित आहे.मराठवाड्यात मुळातच ४.८३ टक्के एवढे वनक्षेत्र आहे. ते वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागलेले दिसले. यासाठी स्वत: विभागीय आयुक्त मराठवाडाभर फिरले. कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. मोटिव्हेशन वाढवले.शिक्षण विभागासाठीही औरंगाबादेत कार्यशाळा घेतली; पण शिक्षण विभागाने वृक्षलागवडीत अजिबात रुची दाखवली नाही. ‘आमची शाळा... आमची टेकडी...’ अशा सुंदर कल्पनेलाही शाळांनी दाद दिली नाही. मराठवाड्यात शंभर टक्के यश मिळवण्यासाठी दोनशे टक्के श्रम करावे लागतात. अन्य विभागात शंभर टक्के श्रम केल्यास दोनशे टक्के यश मिळत असते, याचा प्रत्यय या वृक्षलागवड कार्यक्रमाने दिला. तरीही मराठवाड्याने १३९ टक्केवृक्षलागवड केल्याने अभिनंदन होत आहे.