शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

फक्त २ लाख वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:43 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली

स.सो. खंडाळकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली. मराठवाड्यातील ४० लाख शालेय मुला-मुलींनी प्रत्येकी एक झाड या हिशेबाने ४० लाख झाडे लावावीत, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या संख्येकडून १ लाख ९० हजार एवढी कमी झाडे लावली गेली. ही एक शोकांतिकाच मानली जात आहे, हीच गत जलसंपदा विभागाची झाली. कालव्याच्या बाजूने वा अन्यत्र फार मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची अपेक्षा असताना जलसंपदा विभागाने मात्र वृक्ष लागवडीकडे पाठ फिरविली. त्यांना झाडे लावण्याचा कार्यक्रम अजिबात महत्त्वाचा वाटला नाही.आता आव्हान उभे ठाकणार आहे, ते लावलेली झाडे जगवण्याचे! सुमारे ५० ते ६० टक्के झाडे वन विभाग व सामाजिक वनीकरणाने जगवावीत, हे गृहीतच आहे. याशिवाय वृक्षसंवर्धनासाठीच पुढे आलेल्या ग्रीन आर्मीच्या १२ लाख १३ हजार सदस्यांकडून वृक्षसंवर्धन केले जाईल. मनरेगामधूनही ही झाडे जगवली जाणार आहेत. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांनी संवर्धनाची काळजी घ्यावी, असे अपेक्षित आहे.मराठवाड्यात मुळातच ४.८३ टक्के एवढे वनक्षेत्र आहे. ते वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागलेले दिसले. यासाठी स्वत: विभागीय आयुक्त मराठवाडाभर फिरले. कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. मोटिव्हेशन वाढवले.शिक्षण विभागासाठीही औरंगाबादेत कार्यशाळा घेतली; पण शिक्षण विभागाने वृक्षलागवडीत अजिबात रुची दाखवली नाही. ‘आमची शाळा... आमची टेकडी...’ अशा सुंदर कल्पनेलाही शाळांनी दाद दिली नाही. मराठवाड्यात शंभर टक्के यश मिळवण्यासाठी दोनशे टक्के श्रम करावे लागतात. अन्य विभागात शंभर टक्के श्रम केल्यास दोनशे टक्के यश मिळत असते, याचा प्रत्यय या वृक्षलागवड कार्यक्रमाने दिला. तरीही मराठवाड्याने १३९ टक्केवृक्षलागवड केल्याने अभिनंदन होत आहे.