शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दहावीतही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:25 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्देटक्का घसरला : जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८५.१५ टक्के लागला. नागपूर विभागात निकालात चंद्रपूर जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. मागील तीन वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारली. त्या मुलांच्या तुलनेत अव्वल राहिल्या.चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४६४ शाळांमधून ३१ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील ३१ हजार ८०८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल तीन हजार ८९० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. १० हजार ५४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १० हजार ६३६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ५०९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्हा निकालात सहाव्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी जिल्हा निकालात पाचव्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच घसरली आहे.मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १६ हजार ८०० मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १६ हजार ६८२ मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ७५६ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.४६ आहे.यासोबतच एकूण १५ हजार १७८ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १५ हजार १२६ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ३२८ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८८.११ आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली.पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ५१.२७ टक्केदहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ५१.२७ टक्के लागला आहे. एकूण दोन हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील दोन हजार ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले. पैकी एक हजार ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ५१.२७ आहे. पुरर्परीक्षार्थ्यांमध्ये चार विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तर ९३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.५० शाळांचा निकाल शंभर टक्केयंदा जिल्ह्याच्या निकालाची टक्क़ेवारी घसरली असली तरी शाळांचा निकाल मात्र चांगला लागला आहे. जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांनी शंभर टक्के निकाल दिला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८