शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

‘आॅनलाईन’ ,आरक्षण जोरात!

By admin | Updated: May 10, 2014 23:48 IST

जालना : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्याचा हंगाम आल्याने एस.टी महामंडळाच्या गाड्यामंध्ये गर्दी वाढल्याने आॅनलाईन बुकींग करण्याकडे प्रवाशांचा कल दिसून येत आहे.

जालना : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्याचा हंगाम आल्याने एस.टी महामंडळाच्या गाड्यामंध्ये गर्दी वाढल्याने आॅनलाईन बुकींग करण्याकडे प्रवाशांचा कल दिसून येत आहे. उन्हाळी सुट्या, लग्नसराई तसेच पर्यटनासाठी शहरातील नागरिक विविध ठिकाणी जात आहेत. त्यामुळेच एसटी गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. त्या तुलनेत गाड्यांची संख्या तोकडी पडत आहे. असे असले तरी, गर्दीत ऐनवेळी तारंबळ उडू नये म्हणून काही जागरूक प्रवाशांनी एसटीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन बुकींकवर जास्त भर दिला असल्याचे पहावयास मिळत आहे. आतापर्यंत गाड्यांमधून सहज जागा मिळत असल्यामुळे अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्याचा ट्रेंड तेवढा प्रचलित नव्हता. मात्र, सध्या सुट्यांचा हंगाम असल्यामुळे लांबच्या पल्ल्यासाठी रिझर्व्हेशन करूनच प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांना आपली जागा सुरक्षित असल्याची तसेच प्रवास चांगला होईल, याची हमी मिळते. त्यामुळेच एसटीच्या वतीने दोन वर्षांपासून आॅनलाईन बुकिंगची सुविधा कार्यान्वित करण्यात आली. आतापर्यंत जालना आगारातून २५७ प्रवाशांनी आॅनलाईन बुकिंग केले असून, त्यापोटी ७० हजारांचे उत्पन्न महामंडळाला मिळाले असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक देशमुख यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात एसटीची बुकिंग चालू असून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आॅनलाईन बुकिंगपोटी आगाराला चांगले उत्पन्न मिळाले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. जालना, अंबड, परतूर, जाफराबाद, येथील प्रवाशांना देखील या आॅनलाईन प्रणालीचा फायदा होत आहे. आतापर्यंत चांगला प्रतिसाद प्रवाशांनी दिला आहे. गर्दीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशिष्ट मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांच्या फेर्‍या वाढविण्यात आल्य आहेत. लग्नसराईमुळे काही कर्मचार्‍यांच्या सुट्यामंध्ये कपात केली आहे तर काहींना डबल ड्यूटी देण्यात आली आहे. जालना आगारात ७० ते ७५ गाड्या उपलब्ध आहे. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी जालना आगार कटीबद्ध असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. दरम्यान, एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जात असल्याने प्रवाशांनी खाजगी ट्रॅव्हल्स ऐवजी एसटीलाच पसंती दिली आहे. (प्रतिनिधी) तालुक्यातूनही प्रतिसाद नागपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, मेहकर, बीड, बुलढाणा या ठिकाणी जाण्यार्‍या प्रवाशांसाठी गाड्यांच्या फेर्‍या वाढविण्यात आल्या आहे. सर्व गाड्यांसाठी आॅनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध असून, साध्या गाडीसाठी नियमीत दरापेक्षा पाच रूपये जास्त तर निमआराम, हिरकणीसाठी सात रूपये जादार शुल्क आकारण्यात येत आहे. गर्दीच्या हंगामात चार किंवा सात दिवस सवलत पासलाही प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यटनाला जाणार्‍यांसाठी किफायती ठरत आहे.