शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

आॅनलाईन तक्रारीत जिल्हाधिकारी कार्यालय टॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2016 00:04 IST

औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या.

औरंगाबाद : शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या आॅनलाईन पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक ३१३ तक्रारी आल्या. प्रशासन नावाचा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात उरला नसल्यामुळे नागरिकांना सेवा-सुविधा मिळणे अवघड झाल्याचा हा पुरावा आहे. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ८२३ तक्रारी आल्या होत्या. त्यातील ४०० तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात होत्या. सरकार दरबारी केलेल्या तक्रारींची वेळेत दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला होता. लालफितीचे चटके सहन करून थकलेल्या सामान्य नागरिकाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्यांची आर्थिककुवत जेमतेम आहे. त्यांना गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो. हे पारंपरिक चित्र बदलण्यासाठी लोकांनी केलेल्या तक्रारींची थेट सरकार दरबारी दखल घेण्यासाठी शासनाने सुरूकेलेले ‘आपले सरकार’ हे आॅनलाईन पोर्टल लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या पोर्टलवर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांबाबतीत तक्रारींचा वर्षाव सुरू झाला आहे. राज्य शासनाने १५ आॅगस्ट २०१५ पासून हे पोर्टल सुरू केले. त्यावर आतापर्यंत जिल्ह्यातून विविध खात्यांच्या संदर्भातील ७६३ लोकांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यापैकी ६४० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात ३१३ तक्रारी आल्या. त्यातील २६१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. आॅनलाईन तक्रार नोंदविता येते. आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल घेणे अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संदर्भात असलेल्या तक्रारी प्रथम निवासी उपजिल्हाधिकारी हाताळतात.‘आपले सरकार’च्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रे देण्याचीही सोय आहे. नागरिक इंटरनेटवरून अर्ज करू शकतात. लोकांनी योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांनी केले आहे.