शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

डेंग्यूचा पुन्हा एक बळी

By admin | Updated: September 20, 2016 00:23 IST

औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता.

औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. यानंतरही डेंग्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस शहराभोवती डेंग्यूचा विळखा वाढत असून, या आजाराने एका युवतीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली.शेख सादिया फारुक (१८, रा. देवळाई, मूळ रा. नायगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. प्रकृती खालावल्यामुळे १७ सप्टेंबर रोजी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेंग्यूमुळे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे १८ सप्टेंबर रोजी रात्री तिचा मृत्यू झाला. जिल्हा हिवताप कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यातही ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात डेंग्यूचा उद्रेक अधिक आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्याठिकाणी हे शक्य होत नाही, त्याठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराचा कहर पाहता मनपा आणि आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. सातारा, देवळाई, पुंडलिकनगर, लेबर कॉलनी, गारखेड्यासह विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मोठी आहे.प्रकृती गंभीररुग्ण ज्यावेळी दाखल झाला, तेव्हा प्रकृती गंभीर होती. तरीही डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. रुग्णाचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला, अशी माहिती कमलनयन बजाज रुग्णालयाचे सीईओ डॉ. व्यंकट होळसांबरे यांनी दिली.डेंग्यूने शहरात कोणाचाही मृत्यू नाही- महापालिकेचा दावाशहरातील १६६ वसाहतींमध्ये डेंग्यूने थैमान घातले असून, आतापर्यंत सहापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने मृत्यूशी झुंज देत आहेत. महापालिका प्रशासन दरवर्षीप्रमाणे एकाही रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला नसल्याचा खळबळजनक दावा करीत आहे.४ डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळत जनजागृतीवर अधिक भर देत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. ४पंधरा दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाचवर्षीय चिमुकली माहिम सुलताना मीर आसिफ अली हिचा मृत्यू झाला. शिवाजीनगर येथील अवघ्या एकवर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूने मृत्यू झाला. सोमवारी सातारा-देवळाई परिसरातील १७ वर्षीय शेख सादिया या युवतीचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये डेंग्यूने शहरात ६ जणांचा मृत्यू झालेला असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा करीत आहे. जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक नाही. डेंग्यूमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. विषाणूजन्य तापामुळे मृत्यू झाले आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.