शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

डेंग्यूचा पुन्हा एक बळी

By admin | Updated: September 20, 2016 00:23 IST

औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता.

औरंगाबाद : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूचा उद्रेक सुरू असून, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला लेबर कॉलनीत चिमुकलीचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. यानंतरही डेंग्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस शहराभोवती डेंग्यूचा विळखा वाढत असून, या आजाराने एका युवतीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली.शेख सादिया फारुक (१८, रा. देवळाई, मूळ रा. नायगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. प्रकृती खालावल्यामुळे १७ सप्टेंबर रोजी तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डेंग्यूमुळे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे १८ सप्टेंबर रोजी रात्री तिचा मृत्यू झाला. जिल्हा हिवताप कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यातही ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात डेंग्यूचा उद्रेक अधिक आहे. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन अशा ठिकाणची डासांची अळी नष्ट केली जाते. ज्याठिकाणी हे शक्य होत नाही, त्याठिकाणी अ‍ॅबेट टाकून डासांची अळी नष्ट केली जाते. यासह कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाययोजना करूनही डेंग्यूचा विळखा कमी होत नसल्याचे दिसते. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराचा कहर पाहता मनपा आणि आरोग्य विभाग करीत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. सातारा, देवळाई, पुंडलिकनगर, लेबर कॉलनी, गारखेड्यासह विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या मोठी आहे.प्रकृती गंभीररुग्ण ज्यावेळी दाखल झाला, तेव्हा प्रकृती गंभीर होती. तरीही डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. रुग्णाचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला, अशी माहिती कमलनयन बजाज रुग्णालयाचे सीईओ डॉ. व्यंकट होळसांबरे यांनी दिली.डेंग्यूने शहरात कोणाचाही मृत्यू नाही- महापालिकेचा दावाशहरातील १६६ वसाहतींमध्ये डेंग्यूने थैमान घातले असून, आतापर्यंत सहापेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण डेंग्यूसदृश आजाराने मृत्यूशी झुंज देत आहेत. महापालिका प्रशासन दरवर्षीप्रमाणे एकाही रुग्णाचा डेंग्यूने मृत्यू झाला नसल्याचा खळबळजनक दावा करीत आहे.४ डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळत जनजागृतीवर अधिक भर देत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. ४पंधरा दिवसांपूर्वी लेबर कॉलनी येथील साडेपाचवर्षीय चिमुकली माहिम सुलताना मीर आसिफ अली हिचा मृत्यू झाला. शिवाजीनगर येथील अवघ्या एकवर्षीय चिमुकल्याचा डेंग्यूने मृत्यू झाला. सोमवारी सातारा-देवळाई परिसरातील १७ वर्षीय शेख सादिया या युवतीचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन महिन्यांमध्ये डेंग्यूने शहरात ६ जणांचा मृत्यू झालेला असतानाही महापालिकेचा आरोग्य विभाग एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा करीत आहे. जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक नाही. डेंग्यूमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. विषाणूजन्य तापामुळे मृत्यू झाले आहेत. डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.