शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात पालावर राहणाऱ्या एक लाखावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 15:53 IST

जिल्ह्यात १ लाखावर नागरिकांचे वास्तव्य पालावर असून धुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर जवळपास ५५ जातसंवर्गातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देधुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर पूर्ण भटक्या जाती-जमातींमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात १ लाखावर नागरिकांचे वास्तव्य पालावर असून धुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर जवळपास ५५ जातसंवर्गातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. राईनपाडा घटनेच्या निषेधप्रकरणी भटक्या विमुक्त बहुजन महासंघातर्फे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदन देण्यापूर्वी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, जिल्ह्यात १ लाखाच्या आसपास भटक्या विमुक्त नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या ओळखीसाठी कुठलेही ओळखपत्र त्यांच्याकडे नाही. ५५ जातींच्या प्रवर्गांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यातील अनेकांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड नाही. अनेकांचे पारंपरिक व्यवसायाचे साधन आधुनिकीकरणामुळे संपुष्टात आले आहे. बहुरूपी, डोंबाऱ्यांना गावोगावी फिरून उदरनिर्वाह करण्यासाठी भटकावे लागत आहे. या सगळ्या जातींना रोजगाराच्या संधी जोपर्यंत मिळत नाहीत. तोपर्यंत हे स्थिर होणार नाहीत.

धुळ्यातील राईनपाडा येथील घटनेनंतर पूर्ण भटक्या जाती-जमातींमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली आहे. धान्य सुरक्षितता योजनेतही भटक्या जमातीच्या नागरिकांचा समावेश नाही. त्यांच्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड शिबीर घेण्यात यावे, अशी मागणी महासंघ अध्यक्ष अ‍ॅड. शिरीष जाधव यांनी केली. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. जाधव, केशवराव मोहरकर, कृष्ण बोटुूळे, राजेंद्र गायकवाड, जगन बाबर, शिवाजी कंटक, शंकर सावंत, सर्जेराव बाबर, भरत सोळुंके, शिवाजी शिंदे, भरत सावंत, एकनाथ शिंदे, ईश्वर जगताप, विश्वनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती. 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केल्या मागण्याराईनपाडासह राज्यात भटक्या विमुक्तांच्या हत्या करणाऱ्यांवर भादंवि ३०२ चा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरील कुटुंबातील एकास शासकीय सेवेत नोकरी द्यावी. सरकारतर्फे  २५ लाखांची मदत देण्यात यावी. बार्टी, सार्थीसारखी स्वतंत्र संस्था भटक्या विमुक्तांसाठी स्थापन करावी. या व इतर अनेक मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. 

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादDr Purushottam Bhapkarडॉ पुरुषोत्तम भापकर