शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

दोन अपघातात एक ठार, नऊ जखमी

By admin | Updated: April 14, 2015 00:46 IST

तुळजापूर : रविवारी रात्री तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. यातील एका अपघाताची तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तुळजापूर : रविवारी रात्री तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात एकजण ठार तर नऊजण जखमी झाले. यातील एका अपघाताची तुळजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील काक्रंबा गावाजवळ जीप पलटी होवून एकजण ठार तर सहाजण जखमी झाले. लातूर तालुक्यातील कदम व जाधव कुटुंब रविवारी रात्री एमएच २४/ व्ही ५७६० या क्रमांकाच्या जीपमधून तुळजापूर येथून देवी दर्शन करून गावाकडे परतत होते. तुळजापूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या ज्ञानेश्वर मंदिराजवळ आल्यानंतर त्यांची जीप पलटी झाली. यात चालक बिभीषण जगन्नाथराव सुरवसे (वय ३८, रा. पेठ, ता. जि. लातूर) हे जागीच ठार झाले. तर शालुबाई दिगंबर कदम (वय ६५), मुक्ता परमेश्वर कदम (वय ५८, रा. वायलगाव), स्वाती अविनाश जाधव (वय २२), नंदिनी अविनाश जाधव (वय ०२, रा. व्होताला, चिंचोली) हे गंभीर जखमी झाले. तसेच अविनाश जाधव व पायल जाधव हेही किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींवर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, मयत बिभीषण सुरवसे यांचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.दुसरा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास तुळजापूर-सोलापूर मार्गावर घडला. यात अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले़ पोलिसांनी सांगितले की, सिंदफळ येथील मारोती बबन शितोळे (वय-२५), नाना विश्वनाथ पांडागळे (वय-४०) व विठ्ठल गोविंद सरवदे (वय-४५) हे तिघे रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून तुळजापूरकडे निघाले होते़ त्यांची दुचाकी महामार्गावरील एका ढाब्याजवळ आली असता अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली़ अपघातात दुचाकीवरील तिघेही जखमी झाले़ जखमींवर तुळजापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले होते़ प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ (वार्ताहर)