शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

परीक्षेच्या एक दिवस अगोदर केंद्र बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षा केंद्र बदलण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : परीक्षा विभागाच्या गोंधळाची परंपरा कायम

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलपरीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षा केंद्र बदलण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.विद्यापीठातर्फे दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होत आहे. यात विधिसह बी.एड., एम.कॉम. आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐनवेळी गोंधळ उडाला. याविषयीची तक्रार मराठवाडा लॉ कृती समितीतर्फे करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील विवेकानंद महाविद्यालयात एलएल.बी. प्रथम ते तिसरे वर्ष (तीन वर्षे कोर्स) या अभ्यासक्रमाचे अद्याक्षर ए ते एम क्रमांकाचे विद्यार्थी परीक्षा देणार होते. मात्र, बदल करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रानुसार या महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात परीक्षा देतील. या विद्यार्थ्यांना हे केंद्र देण्यात आले आहे, तसेच डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयात परीक्षा क्रमांक आलेले याच अभ्यासक्रमाचे एन ते झेड अद्याक्षराचे विद्यार्थी व्ही.एन. पाटील विधि महाविद्यालयात परीक्षा देतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील बी.एड. अभ्यासक्रमाचे परीक्षा केंद्र बदलून कै. महारुद्र (बप्पा)मोटे अध्यापक महाविद्यालय गिरवली आणि राजीव गांधी अध्यापक महाविद्यालय, चिंचोली फाटा याठिकाणी देण्यात आले आहे. बीड शहरातील तुलसी संगणशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्र बदलून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याठिकाणी देण्यात आले आहे.कोट,काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा केंद्रे बदलण्यात आली आहेत. काही ठिकाणी संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थी संख्या कमी करण्याची मागणी केली होती. या सगळ्याचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे.-डॉ. प्रताप कलावंत, उपकुलसचिव, परीक्षा विभाग

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठexamपरीक्षा