शिरीष शिंदे , बीडपाणी हे जीवन असल्याचे मानले जाते मात्र अयोग्य प्रकारचे पाणी पिले तर पाणी जिव घेणारे विष समान होते. पाण्यात विविध प्रकारचे घटक असतात. ‘लोकमत’ने सर्व्हेक्षणासाठी शहरातील हॉटेल, नगर पालिका, बोअर व कार्यालयांमध्ये दिले जाणाऱ्या जारच्या पाण्यातील क्षारची तपासणी केली असता सर्वाधिक क्षार बोअरच्या पाण्यात दिसून आले. इलेक्ट्रोलिसीस मशीनद्वारे बोअरच्या पाण्याचे विघटन केले असता हे पाणी अत्यंत घाण व पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले आहे. विशेषबाब म्हणजे, बोअरच्या पाण्यात १२३० टीडीएस असल्याचे समोर आले. शुद्ध व स्वच्छ पाणी पिणे हे आपल्यासाठी आवश्यक बाब आहे मात्र अनेकजण याला दुय्यम स्थान देतात. कोठेही, कोणत्याही ठिकाणी मिळणारे पाणी पिणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश हॉटेल धारक बोअरच्या पाण्याचा वापर करतात. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना बोअरचे पाणी पाजले जाते. केवळ हॉटेलमध्येच नव्हे तर जवळपास प्रत्येक घरांमध्ये बोअरचे पाणी वापरले जाते. बोअरचे पाणी वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा वाजत आहे. अशा प्रकारचे पाणी पिणे अत्यंत घातक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालिकेचे पाणीही अयोग्यचनगर परिषदच्यावतीने शहरात पुरविल्या जाणाऱ्या पाण्याची चाचणी टीडीएस मिटरने केली असता पाण्यात २३० टीडीएस असल्याचे समोर आले म्हणजे हे पाणी पिण्यास योग्य म्हणता येईल मात्र अधिक काळ हे पाणी पिले तर किडनी स्टोनचा धोका उद्भवू शकतो असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.इलेक्ट्रोलायझरने चाचणी केली असता न.प.च्या पाण्याचा रंग पिवळा झाला. पाण्यात अजैविक असे कॅलशिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सोडीअम, बायकोर्बोनेट्स, क्लोराईड आणि सल्फेटस याचा समावेश असतो. याचा समुह म्हणजे टीडीएस. पाण्याची तपासणी केली असता टीडीएसमशीनद्वारे पाण्यात वरील पैकी कोणत्या घटकाचा अधिक समावेश आहे, हे समजून येते. बोअरच्या पाण्यावर मदार४जिल्ह्यात सतत पडत असणाऱ्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बोअरच्या पाण्यावरच तहाण भागवावी लागत आहे. पिण्यास पाणीच मिळत नसल्याने त्यांना उपलब्ध पाण्यावर तहाण भागवावी लागत आहे. एकतर पाणी मिळत नाही आणि मिळत असलेले पाणी चांगले आहे की नाही, याची पाहणी ग्रामीण भागातील ग्रामस्थ करत नाहीत. अनेकांना पाण्यात क्षार किती व त्याचा शरीरास फायदा व तोटा किती याची माहितीच नाही. शहरातील हॉटेल्स व घरांमध्ये बोअरच्या पाण्याचा वापर केला जातो. पिण्याच्या पाण्यामध्ये क्षार असणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे मानवी शरीरासाठी १०० ते १५० टीडीएस क्षार पुरेसे असते. मात्र शहरातील हॉटेल व घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बोअरच्या पाण्यात १२३० टक्के क्षार असल्याची धक्कादायक बाब सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. यामुळे बोअरचे पाणी पिणे आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे.इलेक्ट्रोलिसीस मशीनचा वापरपाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने सध्या वॉटर प्युरिफीकेशन अर्थात पाणी शुद्धीकरण करणाऱ्या मशीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाण्यातील घाण व क्षार किती आहे हे दाखविण्यासाठी पाण्याचे विघटन करण्यासाठी इलेक्ट्रोलिसीस मशीनचा वापर केला जातो. पाणी भरलेल्या ग्लासवर मशीन एक मिनिट लावली जाते. त्या कालावधीत पाण्यातील क्षार व घाण ग्लासच्या वरच्या बाजूला जमा होतात तर इतर घटक खाली राहतात. असे केले विटघनशहरातील हॉटेल्समध्ये ग्राहकांना दिले जाणारे पाणी, नगर परिषदेचे पाणी, कार्यालय व दुकांनामध्ये दिले जाणारे जारचे मिनरल पाणी वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये घेतले गेले. काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन पाण्याचे विटघन करणारे इलेक्ट्रोलिसीस मशीनद्वारे परिक्षण केले. घरामध्ये व हॉटेल्समध्ये वापरले जाणारे पाणी प्रक्रीये दरम्यान तात्काळ गरम होऊन त्यावर ग्लासमध्ये शेवाळ प्रमाणे घाण साचली गेली. टीडीएस मीटरने सदरील पाणी तपासले असता बोअरच्या पाण्यात १२३० टीडीएस असल्याचे समोर आले. पाण्यातील क्षारांची क्षमता २०० असली पाहिजे. परमिशिबल लिमिटही एवढीच असल्याचे डॉक्टरही सांगतात. न.प.च्या वतीने सोडण्यात येणारे पाणी हे शुद्ध असते. पाणी फिल्टरायझेशन करताना तुरटीचा वापर केला जातो. तर निर्जंतुक करण्यासाठी ब्लिचिंग व फ्लोरीन गॅसचा वापर केला जातो. प्रत्येक वर्षी दोन वेळा पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. जर न.प.च्या पाण्यात २०० पेक्षा अधिक क्षार असल्याचे समोर आले तर माजलगाव धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा लागेल, असे न.प.पाणीपुरवठा अभियंता एम.एस. वाघ म्हणाले. योग्य प्रकारचे पाणी पिले तर आजार जडत नाहीत. त्यामुळे बाहेरचे पाणी पिणे टाळले पाहिजे. पाणी प्याचेचे असेल तर बंद बाटलीतील पाणी पिणे चांगले राहिल. बोअरच्या पाण्यात १२३० क्षार असतील तर हे क्षारचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वॉटर प्युरिफायरचे पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार जडत असल्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे जरूरी आहे. पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो यासारखे आजारही होतात. हल्ली किडनी स्टोनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मत जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सचिन वारे यांनी व्यक्त केले. पाण्यात अधिक क्षार असल्यामुळे किडनीस्टोन आजार शहरी भागातील लोकांना जडत चालले आहेत. ग्रामीण भागात पाण्यातील टीडीएस अडीचशेच्या आसपास असते. त्यामुळे ग्रामीण भागातही किडनीस्टोनचे रूग्ण वाढत चालले आहेत. हा आजार जडल्यानंतर लवकर निघून जात नाही. केज तालुक्यातील एका ८१ वर्षीय वृद्धाने किडनी स्टोनच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे किडनीस्टोनचा त्रास किती मोठा असेल हे लक्षात येते. विशेष म्हणजे किडनी स्टोन आजार जडल्यानंतर पाच ते सहा महिन्यानंतर उपचार घेतल्यानंतर खडा पडूृ शकतो. परंतु हा आजार मुळापासून नष्ट होत नाही. काही दिवसांनी हा आजार परत उद्भवतो. यावर होमिओपॅथी व आयुर्वेदीक उपचार प्रभावी ठरत असल्याचे अनेक रुग्णांनी उपचाराअंती सांगितले.
एकच प्याला विषाचा !
By admin | Updated: January 21, 2015 01:10 IST