शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा फटका; औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात दीड लाख कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:49 IST

वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा आणि पैठण- चितेगाव या पाचही औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना फटका

ठळक मुद्दे ‘सिटू’ या कामगार संघटनेने केला दावा एक लाख कंत्राटी कामगारांनी गमावली नोकरी 

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील पाचही औद्योगिक वसाहतींमध्ये कार्यरत सुमारे दीड लाख कामगार- कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. यामध्ये अस्थायी ५० हजार व कंत्राटी पद्धतीच्या १ लाख कामगार- कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असा दावा ‘सिटू’ कामगार संघटनेचे नेते उद्धव भवलकर यांनी केला आहे. 

‘लोकमत’शी बोलताना उद्धव भवलकर म्हणाले की, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, शेंद्रा आणि पैठण- चितेगाव या पाचही औद्योगिक वसाहतींमध्ये ‘सिटू’चे मोठ्या संख्येने कामगार कार्यरत आहेत. संघटनेच्या पाहणीतून हे आकडे समोर आले. लॉकडाऊनमध्ये उद्योग बंद असले तरी त्यांना वेतन मिळाले पाहिजे, अशी भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतली होती. मात्र, अस्थायी कामगारांना उद्योगांनी एक छदामही दिला नाही. उपासमारीमुळे अनेक कामगार गावी परतले. ‘अनलॉक’ सुरू झाल्यानंतर हळूहळू उद्योग सुरू झाले. सद्य:स्थितीत पूर्णक्षमतेने बाजारपेठा सुरू नाहीत. त्यामुळे उत्पादित मालाला उठाव नाही. दुसरीकडे आॅर्डरही घटल्या आहेत. त्यामुळे ३० ते ६० टक्के उत्पादन क्षमतेने उद्योग सुरू आहेत. 

जिल्ह्यात एकूण सव्वादोन लाख कंत्राटी, तर दीड लाख स्थायी- अस्थायी कामगार उद्योगांत कार्यरत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यातील दीड लाख कामगारांना नोकरी गमवावी लागली. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष प्रभाकर मते यांनी सांगितले की, कोरोनाने लाखो कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. औरंगाबादचे लाखो कामगार बेरोजगार झाले. उद्योगांनी या कामगारांना परत कामावर घ्यावे, यासाठी आम्ही उद्योगमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. 

...अन्यथा बेरोजगार कामगार गुन्हेगारीकडे वळतीलकामगार नेते उद्धव भवलकर म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात दीड लाख कामगार-कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. या कामगारांना लॉकडाऊनच्या काळातील किमान अर्धे तरी वेतन मिळाले पाहिजे. त्यांना परत कामावर घेतले पाहिजे; अन्यथा उपासमारीमुळे त्रस्त झालेले हे बेरोजगार कामगार गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका आहे. 

सुमारे ६० हजार कामगार-कर्मचाऱ्यांवर संकट ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी मात्र, नोकरी गमावलेल्या कामगार- कर्मचाऱ्यांची संख्या ६० हजारांच्या जवळपास असेल, असे सांगितले. ते म्हणाले की, उद्योग सुरू झाले. मात्र, जिल्हा- राज्य सीमा बंद असल्यामुळे अनेक कामगार अडकून पडले आहेत. पास काढून यावे, तर आल्यावर दहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागते म्हणून ते येत नाहीत. ५३ वर्षांवरील कामगार सुरक्षेसाठी घरी बसून आहेत. दुसरीकडे, अजूनही बाजारपेठा पूर्ण क्षमतेने उघडलेल्या नसल्यामुळे उद्योग ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे सध्या कामगारांची तेवढी गरज भासत नाही.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायLabourकामगार