शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पासपोर्टसाठी दीड महिन्यांची वेटिंग; हेलपाटे टाळण्यासाठी कागदपत्रांतील तफावत टाळा

By साहेबराव हिवराळे | Updated: July 29, 2023 17:28 IST

शनिवारी सुरू ठेवूनही दीड महिन्याची वेटिंग हटेना; स्कॅनर सुरू करण्याची अपेक्षा

छत्रपती संभाजीनगर : पासपोर्ट काढण्यासाठी आता स्वत:च ऑनलाईन अर्ज भरून मुलाखती देता येणे सोपे आहे. पण कागदपत्रात मूळ नावाला ‘भाऊ, राव, जी, बेन, बेगम’, अशी अधिकची बिरुदे लावणे महागात पडत आहे. त्यामुळे परत अर्ज करावा लागतो. गुजरातमध्ये तर अनेक अर्जदारांनी नियमात बदल करण्याची मागणी केली आहे. म्हणून योग्य कागदपत्र जोडून चकरा टाळाव्यात, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.

विदेशात नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने पासपोर्ट कार्यालयात गर्दी होते. २०१७ पासून सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे स्थानिक नागरिकांची पायपीट आणि आर्थिक बचत झाली. परंतु, काही तांत्रिक बाबीमुळे समस्या येतात. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना दीड महिन्यानंतर मुलाखतीचा संदेश मोबाईलवर येतो.

टी.सी.वर असलेल्या नावात बदल करून काहीजण पुढे विशेषणे लावतात. परंतु, त्याची तफावत पडताळणीत लक्षात आल्यावर अडचण होते किंवा पर्यायी कागदपत्रे दाखवावी लागतात. यात रहिवासी ओळखीचा पुरावा महत्त्वाचा मानला जातो. या कार्यालयात स्कॅनर, प्रोसेसर अद्यापही बसविण्यात आले नसल्याने विलंबानेच पडताळणीचा नंबर लागतो.

हेलपाटे टाळण्यासाठी...योग्य नामोल्लेख असलेली कागदपत्र दाखल केलेल्याच कॉपी कार्यालयात दाखल कराव्यात. तफावत असलेली कॉपी दाखल केल्यास अर्जदारास परत अर्ज करून पुढील तारीख घ्यावी लागते.

विलंब कमी होणार...वाढती प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी येथेच डाॅक्युमेंट स्कॅन जर झाले, तर मुंबई कार्यालयास पाठवून प्रतीक्षा करीत बसण्यापेक्षा लवकरच पासपोर्ट अर्जदाराच्या हाती पडेल, अशी तयारी येथे सुरू आहे. शनिवारीदेखील कार्यालय सुरू असते. परंतु, वेटिंग लिस्ट कमी झालेली नाही. अर्ज लवकर निकाली काढण्यासाठी टेबल वाढविले जातील.- प्रल्हाद पेंडणेकर, सर्व्हे अधिकारी, पासपोर्ट सेवा केंद्र

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट