शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने बळीराजाचा केला वांदा

By admin | Updated: May 22, 2014 00:31 IST

रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यासह परजिल्ह्यातून नवा कांदा मोठ्या प्रमाणात नांदेड बाजारपेठेत दाखल झाल्याने बुधवारी लिलावात कांद्याचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर होते.

रामेश्वर काकडे , नांदेड जिल्ह्यासह परजिल्ह्यातून नवा कांदा मोठ्या प्रमाणात नांदेड बाजारपेठेत दाखल झाल्याने बुधवारी लिलावात कांद्याचे दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलवर होते. अधिच गारपिटीने झोडपलेल्या उत्पादकांना पुन्हा कांद्याने रडवले आहे. शहरातील बाजारात जिल्ह्याच्या विविध भागासह हिंगोली, परभणी, लासलगाव, नाशिक, पिंपगाव, बसवंत, सोलापूर, अहमदनगर, आंध्रा, कर्नाटक आदी ठिकाणाहून कांदा दाखल होत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी नवा कांदा काढल्यानंतर त्याची साठवणूक न करता तो थेट विक्रीसाठी आणत आहे. नांदेडच्या बाजारात आठवड्यात ४० ते ५० गाड्या कांदा दाखल होत असल्यामुळे प्रतिक्विंटल दर ३०० ते ७०० रुपयावर आले आहेत. शेतकर्‍यांनी उत्पादनासाठी टाकलेला खर्च, वाहतुकीसाठी केलेला खर्च जास्त अन् उत्पादन कमी या तफावतीमुळे शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ६ रुपयापासून १२ रुपयापर्यंत आहेत. गतवर्षी कांद्याचे भाव प्रतिकिलो ६० ते ७० रुपयावर जाऊन ठेपले होते. परिणामी अनेक हॉटेल, भोजनालयातून कांदा हद्दपार झाला होता. दर कमी झाल्याने कांदा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सर्वच भागात एकाच वेळी नवा कांदा काढणीस प्रारंभ झाल्याने भाव घसरत आहेत. केवळ चांगल्या प्रतीच्या कांद्यालाच ६०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे. ज्यावेळेस शेतकर्‍यांकडील कांदा संपतो त्यावेळी मात्र बाजारातील भाव गगनाला भिडतात. परंतु शेतकर्‍यांकडील कादां बाजारात दाखल झाल्यानंतर मात्र त्यांना फुकटभाव विक्री करावी लागते. कांद्यांचे उत्पादन शेतकरी घेत असले तरी दर ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही. उत्पादित कांद्याची साठवणूक करण्यासाठी आधुनिक कांदाचाळ नसल्याने काढलेला कांदा, थेट बाजारात आणून विक्री करावा लागतो. एका एकरामध्ये ४० हजार रुपयाचे स्प्रिंक्लर बसविले असून बियाणे व इतर यासाठी ४२ हजार असा एकूण ८२ हजार रुपये खर्च केला. मात्र दर कमी झाल्याने यातून केवळ २० हजाराचे उत्पन्न मिळाले. यासाठी शासनाने शेतकर्‍यांना आधुनिक कांदाचाळ उभारणीसाठी सहाय्य करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया कळमनुरी तालुक्यातील झुंझुणवाडी येथील शेतकरी गोविंद जाधव यांनी दिली़ तर एका एकरात कांदा लागवडीसाठी मला १६ हजार रुपये खर्च झाला. तर उत्पन्न १२ हजार रुपये मिळाले. यातून कांद्यासाठी टाकलेला उत्पादन खर्चही निघाला नसल्याचे कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील शेतकरी भागोराव हाके यांनी सांगितले़