शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

काळाचा घाला ! वृद्ध पित्याला द्यावा लागला तरुण मुलांच्या जनाजाला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 19:09 IST

एकाच कुटुंबातील ३ मुलांचा करुण अंत झाल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

ठळक मुद्देमृतांपैकी चार मुले हे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. एकाचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु होते

करमाड : कोबी काढण्याच्या कामासाठी नाथनगर वडखा येथे गेलेल्या ५ तरुणांचा पाझर तलावात बुडून शुक्रवारी मृत्यू झाल्याचे कळताच भालगावात शोककळा पसरली होती. वृद्ध पित्याला आपल्या तरुण मुलांच्या जनाजाला खांदा देण्याची वेळ आल्याचे दृश्य पाहून गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. 

एकाच कुटुंबातील ३ मुलांचा करुण अंत झाल्याने शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या मृत तरुणाचे वडील युसूफ शेख हे टेम्पोचालक असून, पत्नी व ५ मुलांसह भालगाव येथे राहतात. टेम्पो चालवून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, तर इतर दोन्ही मृतांना प्रत्येकी एक भाऊ आहे. सध्या लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद असल्याने व बकरी ईदनिमित्त कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी पाचही तरुण कोबी काढण्याच्या कामासाठी शुक्रवारी नाथनगर वडखा येथे गेले आणि तलावात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या आक्रोशामुळे गावातील सर्वांचेच हृदय हेलावले. या दुर्दैवी घटनेबद्दल आ. हरिभाऊ बागडे यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. याबाबत चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी सांगितले. 

मृतांपैकी चार जण महाविद्यालयीन विद्यार्थीमृतांपैकी चार मुले हे चित्तेपिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. शेख समीर व शेख अन्सार हे याचवर्षी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. सोहेल युसूफही दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता, तर अतिक हाही याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून, सध्या त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादdrowningपाण्यात बुडणे