शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

By नंदकिशोर पाटील | Updated: April 23, 2024 12:26 IST

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे.

छत्रपती संभाजीनगर : अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक अकल्पित, अतार्किक आणि अविश्वसनीय अशा राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कालपरवापर्यंत जे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, जे एका ताटात जेवत होते, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत होते, कौटुंबिक सोहळ्यात एकाच फ्रेममध्ये दिसून येत होते, तेच आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत! कालचे मित्र, शत्रू झाले असून, काल जे शत्रू पक्षात होते तेच आज मित्रपक्षात आले आहेत!! 

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. शिवसेनेचेच उदाहरण घ्या. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची दोन शकले होतील आणि तेच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटतील, अशी कल्पना तरी कोणी केली होती का? शिवसेनेत आजवर अनेकांनी बंड केले. पण, ते सगळे इतर पक्षांच्या वळचणीला गेले. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले; पण त्यांनी सेनेवर वारसा हक्क न सांगता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने स्वतंत्र पक्ष काढला. पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत निवडणुकीला सामोरे गेले. मोदींचे गोडवे गात त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली होती. आज ठाकरे काँग्रेस सोबत आहेत, तर शिंदे भाजपसोबत जाऊन ठाकरेंवर टीका करीत आहेत ! 

राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेत उभी फूट पाडली. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत. राज्यातील २५ टक्के जागांवर उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशीच लढती होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद आणि हिंगोली या दोन जागांवर दोन्ही सेनेत थेट सामना होत आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली अशा चार जागा, तर महायुतीत शिंदेसेनेकडे हिंगोली आणि औरंगाबाद अशा दोनच जागा मिळाल्या आहेत. औरंगाबादची जागा पदरात पाडून घेण्यासाठी महिनाभर प्रयत्न करावे लागले.

दोन खासदार, तीन आमदारशिवसेनेतील फुटीनंतर बहुसंख्य खासदार आणि आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र, मराठवाड्यातील संजय ऊर्फ बंडू जाधव (परभणी) आणि ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) हे दोन्ही खासदार ठाकरे यांच्या सोबत राहिले, तर हिंगोलीचे हेमंत पाटील शिंदेसोबत गेले. मराठवाड्यात शिवसेनेचे (एकत्रित) अकरा आमदार आहेत. पैकी उदयसिंह राजपूत (कन्नड), डॉ. राहुल पाटील (परभणी) आणि कैलास पाटील (उस्मानाबाद) हे तीन आमदार वगळता उर्वरित आठजण शिंदे यांच्यासोबत आहेत. शिंदे यांच्या बंडाला मराठवाड्यातून मोठे पाठबळ मिळाल्याने त्याची बक्षिसी म्हणून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या तिघांना मंत्रिपदे मिळाली.

उमेदवार तुल्यबळज्या तीन जागांवर दोन्ही सेनेत थेट लढती होत आहेत, तिथे दोन्हीकडेचे उमेदवार तसे तुल्यबळ आहेत. औरंगाबादेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांना मैदानात उतरविले आहे. चार टर्म खासदार, राज्यात मंत्री राहिलेले खैरे यांचा २०१९च्या निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. अपक्ष हर्षवर्धन जाधव मैदानात नसते तर खैरेच निवडून आले असते. खैरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती होते. निष्ठावान शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. म्हणून शिवसेना फुटीनंतरही ते ठाकरे यांच्यासोबत राहिले. मंत्री भुमरे हेदेखील ज्येष्ठ आहेत. आमदारकीची त्यांची ही पाचवी टर्म आहे. मात्र, त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेत येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. परभणीत उद्धव सेनेचे संजय जाधव विरुद्ध रासपाचे महादेव जानकर अशी लढत होत आहे. जाधव हे विद्यमान खासदार असून, जानकर हे या मतदारसंघात नवखे आहेत.

सगेसोयरे आमने-सामनेउस्मानाबादेत सगेसोयऱ्यांतच लढत होत आहे. उद्धवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील हे नातलग आहेत. अर्चना पाटील या आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असून, जगजितसिंह यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील आणि ओमराजे यांचे वडील स्व. पवनराजे हे चुलतभाऊ होत. एका अर्थाने ही भाऊबंदकीची लढाई आहे.

हिंगोलीत दोन्ही भिडू पुन्हा लढू !हिंगोलीच्या जागेवरून महायुतीत बरेच रणकंदन झाले. गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे इच्छुक या मतदारसंघात काम करीत होते. मात्र, ऐनवेळी ही जागा शिंदेसेनेला सुटली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य घडले. उमेदवार देतानादेखील अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली; मात्र त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देऊ, हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली. उद्धवसेनेने नागेश पाटील आष्टीकर या निष्ठावान शिवसैनिकाला संधी दिली. नागेश पाटील आणि बाबूराव कदम हे दोघेही विधानसभा निवडणुकीत हदगावमधून आमनेसामने होते. कदम यांनी बंडखोरी केली होती. मात्र, या दोघांच्या भांडणात माधवराव पाटील (काँग्रेस) निवडून आले. आता पुन्हा कदम-पाटील यांच्यात दुसरा सामना रंगतो आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Big Bash Leagueबिग बॅश लीग