शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अरे, आवाज कोणत्या शिवसेनेचा ? शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईत कोण ठरणार वरचढ?

By नंदकिशोर पाटील | Updated: April 23, 2024 12:26 IST

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे.

छत्रपती संभाजीनगर : अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक अकल्पित, अतार्किक आणि अविश्वसनीय अशा राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. कालपरवापर्यंत जे एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले होते, जे एका ताटात जेवत होते, एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत होते, कौटुंबिक सोहळ्यात एकाच फ्रेममध्ये दिसून येत होते, तेच आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत! कालचे मित्र, शत्रू झाले असून, काल जे शत्रू पक्षात होते तेच आज मित्रपक्षात आले आहेत!! 

लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. शिवसेनेचेच उदाहरण घ्या. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची दोन शकले होतील आणि तेच एकमेकांच्या विरोधात दंड थोपटतील, अशी कल्पना तरी कोणी केली होती का? शिवसेनेत आजवर अनेकांनी बंड केले. पण, ते सगळे इतर पक्षांच्या वळचणीला गेले. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले; पण त्यांनी सेनेवर वारसा हक्क न सांगता महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने स्वतंत्र पक्ष काढला. पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत निवडणुकीला सामोरे गेले. मोदींचे गोडवे गात त्यांनी काँग्रेस पक्षावर सडकून टीका केली होती. आज ठाकरे काँग्रेस सोबत आहेत, तर शिंदे भाजपसोबत जाऊन ठाकरेंवर टीका करीत आहेत ! 

राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेत उभी फूट पाडली. एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या. दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत. राज्यातील २५ टक्के जागांवर उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशीच लढती होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद आणि हिंगोली या दोन जागांवर दोन्ही सेनेत थेट सामना होत आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली अशा चार जागा, तर महायुतीत शिंदेसेनेकडे हिंगोली आणि औरंगाबाद अशा दोनच जागा मिळाल्या आहेत. औरंगाबादची जागा पदरात पाडून घेण्यासाठी महिनाभर प्रयत्न करावे लागले.

दोन खासदार, तीन आमदारशिवसेनेतील फुटीनंतर बहुसंख्य खासदार आणि आमदार शिंदे यांच्यासोबत गेले. मात्र, मराठवाड्यातील संजय ऊर्फ बंडू जाधव (परभणी) आणि ओमराजे निंबाळकर (उस्मानाबाद) हे दोन्ही खासदार ठाकरे यांच्या सोबत राहिले, तर हिंगोलीचे हेमंत पाटील शिंदेसोबत गेले. मराठवाड्यात शिवसेनेचे (एकत्रित) अकरा आमदार आहेत. पैकी उदयसिंह राजपूत (कन्नड), डॉ. राहुल पाटील (परभणी) आणि कैलास पाटील (उस्मानाबाद) हे तीन आमदार वगळता उर्वरित आठजण शिंदे यांच्यासोबत आहेत. शिंदे यांच्या बंडाला मराठवाड्यातून मोठे पाठबळ मिळाल्याने त्याची बक्षिसी म्हणून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या तिघांना मंत्रिपदे मिळाली.

उमेदवार तुल्यबळज्या तीन जागांवर दोन्ही सेनेत थेट लढती होत आहेत, तिथे दोन्हीकडेचे उमेदवार तसे तुल्यबळ आहेत. औरंगाबादेत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांना मैदानात उतरविले आहे. चार टर्म खासदार, राज्यात मंत्री राहिलेले खैरे यांचा २०१९च्या निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. अपक्ष हर्षवर्धन जाधव मैदानात नसते तर खैरेच निवडून आले असते. खैरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती होते. निष्ठावान शिवसैनिक म्हणून ते ओळखले जातात. म्हणून शिवसेना फुटीनंतरही ते ठाकरे यांच्यासोबत राहिले. मंत्री भुमरे हेदेखील ज्येष्ठ आहेत. आमदारकीची त्यांची ही पाचवी टर्म आहे. मात्र, त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभेत येतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी नाही. परभणीत उद्धव सेनेचे संजय जाधव विरुद्ध रासपाचे महादेव जानकर अशी लढत होत आहे. जाधव हे विद्यमान खासदार असून, जानकर हे या मतदारसंघात नवखे आहेत.

सगेसोयरे आमने-सामनेउस्मानाबादेत सगेसोयऱ्यांतच लढत होत आहे. उद्धवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्चना पाटील हे नातलग आहेत. अर्चना पाटील या आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असून, जगजितसिंह यांचे वडील डॉ. पद्मसिंह पाटील आणि ओमराजे यांचे वडील स्व. पवनराजे हे चुलतभाऊ होत. एका अर्थाने ही भाऊबंदकीची लढाई आहे.

हिंगोलीत दोन्ही भिडू पुन्हा लढू !हिंगोलीच्या जागेवरून महायुतीत बरेच रणकंदन झाले. गेल्या दोन वर्षांपासून भाजपचे इच्छुक या मतदारसंघात काम करीत होते. मात्र, ऐनवेळी ही जागा शिंदेसेनेला सुटली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य घडले. उमेदवार देतानादेखील अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली; मात्र त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी देऊ, हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली. उद्धवसेनेने नागेश पाटील आष्टीकर या निष्ठावान शिवसैनिकाला संधी दिली. नागेश पाटील आणि बाबूराव कदम हे दोघेही विधानसभा निवडणुकीत हदगावमधून आमनेसामने होते. कदम यांनी बंडखोरी केली होती. मात्र, या दोघांच्या भांडणात माधवराव पाटील (काँग्रेस) निवडून आले. आता पुन्हा कदम-पाटील यांच्यात दुसरा सामना रंगतो आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Big Bash Leagueबिग बॅश लीग