शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
3
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकली; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
6
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
7
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
8
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
9
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
10
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
11
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
12
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
13
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
14
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
15
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
16
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
17
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
18
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
19
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
20
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’मध्ये अधिकारी-पदाधिका-यांचा कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:32 IST

सरते वर्ष २०१७ हे जिल्हा परिषदेसाठी वादग्रस्त ठरले. मार्चमध्ये नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आले, तेव्हापासून अधिकारी आणि पदाधिकाºयांमध्ये एकवाक्यता नाही. सुसंवाद नाही.

विजय सरवदे।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सरते वर्ष २०१७ हे जिल्हा परिषदेसाठी वादग्रस्त ठरले. मार्चमध्ये नवीन सदस्य मंडळ अस्तित्वात आले, तेव्हापासून अधिकारी आणि पदाधिकाºयांमध्ये एकवाक्यता नाही. सुसंवाद नाही. विविध कारणांवरून सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून एकाही विभागाचा निधी अजूनही मार्गी लागलेला नाही. दोघांच्या वादात निधी तिजोरीत पडून राहिला, तर यात पदाधिकारी-सदस्यांचेच मोठे नुकसान आहे. अधिकारी-पदाधिकाºयांनी एकमेकांमध्ये वाढलेली दरी कमी करण्याचा प्रयत्न केलेला बरा. अधिकारी आपला तीन वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करून निघून जातील; मात्र पदाधिकारी-सदस्य आपल्या मतदारांना कामे न केल्याचा जाब काय देतील?निवडणुकीचे वारे जोरातजिल्ह्यात जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी दिलीप वळसे, धनंजय मुंडे, सेनेच्या प्रचारार्थ पालकमंत्री रामदास कदम, खा. चंद्रकांत खैरे, भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांसाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांनी वातावरण ढवळून टाकले.च्जिल्ह्यातील ६२ जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या १२४ गणांसाठी १६ फेब्रुवारीला ७० टक्के मतदान झाले.भाजपचा उधळता वारू रोखलाशिवसेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत आघाडी करून यशस्वी खेळी केली. औरंगाबाद, सोयगाव या दोन पंचायत समित्यांमध्ये सेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी केली. औरंगाबाद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचा सभापती, तर सेनेचा उपसभापती निवडून आला. या निवडणुकीत काँग्रेसच्या ताराबाई उकिर्डे, तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या कविता राठोड निवडून आल्या.च्मार्च महिन्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या सेनेच्या देवयानी पाटील डोणगावकर, तर उपाध्यक्षपदी केशव तायडे (काँग्रेस) विजयी झाले. या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला दारुण पराभव पत्करावा लागला.च्जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतरच्एम.के. देशमुख यांच्याकडे प्रभारी शिक्षणाधिकारी पदाची धुरा सोपविण्यात आली. काही महिन्यांनंतर त्यांची जालना येथे बदली झाल्यामुळे गटशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला. काही दिवसांनंतर अशोक कडूस हे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून आले; परंतु अवघ्या दहाच दिवसांत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली. त्यामुळे पुन्हा रवींद्र वाणी यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार सोपविण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात वाणी यांच्याकडील प्रभारी पदभार काढून तो उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्याकडे सोपविण्यात आला.३१ मार्च रोजी आरोग्य संचालनालयाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानास (एनआरएचएम) वर्षभराची मुदतवाढ दिली. यामुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार कर्मचाºयांचा जीव भांड्यात पडला.च्१ मे २०१५ रोजी जिल्हा परिषदेत सेवानिवृत्तांसाठी स्वतंत्र पेन्शन सेल कार्यान्वित करण्यात आला. जवळपास ६ हजार ५०० सेवानिवृत्तांना विनाव्यत्यय व वेळेत सर्व सेवा मिळत होत्या. केवळ अधिकाºयांच्या वर्चस्व वादातून जिल्हा परिषदेतील पेन्शन सेल बंद करण्यात आला होता. तो आता पूर्ववत सुरू करण्यात आला.च् नवीन शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान २५ टक्के जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम राबवण्याच्या सूचना शिक्षण सभापती मीना शेळके यांनी गटशिक्षणाधिकाºयांना दिल्या.३ जुलै रोजीच्आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्हा परिषदेने आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया राबविली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी पहिल्या टप्प्यात २५९ शिक्षकांना विविध जिल्ह्यांत जाण्यासाठी येथून कार्यमुक्त केले.४ आॅगस्ट रोजी शिक्षणाधिकारी अशोक कडूस बडतर्फच्शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना शासनाने बडतर्फ केल्याचे वृत्त केवळ ‘लोकमत’नेच सर्वप्रथम प्रसिद्ध केले. जिल्हा परिषदेतील सर्वच अधिकारी-कर्मचारी याबाबत अनभिज्ञ होते. दुसºया दिवशी शनिवारी सकाळी ‘लोेक मत’मध्ये ही बातमी वाचून अनेकांना धक्काच बसला.च्आॅगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी डॉ. सचिन मडावी यांना पदभार सोडावा लागला. समाजकल्याण अधिकाºयांचा पदभार समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. एस. शेळके यांच्याकडे सोपविण्यात आला.‘सीईओं’च्या दालनासमोरच ठिय्याच्दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, दलित, बहुजनांची अडवणूक करणाºया प्रशासनाचे करायचे काय, अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना- काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला.