शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:06 IST

महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २०१५ मध्ये २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला होता. या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. शासनाने रस्त्याच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता शोधून काढण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी २०१५ मध्ये २४ कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला होता. या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. शासनाने रस्त्याच्या निविदा प्रक्रियेतील अनियमितता शोधून काढण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली आहे. त्यामुळे महापालिका अधिका-यांचे धाबे अधिक दणाणले आहेत.शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाने महापालिकेला २४ कोटी २३ लाख रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून गजानन महाराज मंदिर ते जय भवानीनगर, सेव्हनहिल ते सूतगिरणी चौक, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक, संत तुकोबानगर व क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आणि मनपाने निविदा प्रसिद्ध केली होती. त्यातील क्रांतीचौक ते महावीर चौक हा रस्ता वगळता इतर रस्त्यांची कामे करण्यात आली. निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेत एमआयएमचे नगरसेवक विकास एडके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. समितीचे अध्यक्ष हे प्रधान सचिव आहेत, तर मुंबई महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक सुहास शिंदे व नगर विकास विभागाचे उपसचिव हे सदस्य आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून १० जूनपर्यंत अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे.शासनाने समिती नियुक्त केल्याने महापालिका अधिका-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. यापूर्वी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी या अनियमितता प्रकरणी दोषी अधिका-यांवर निलंबनाची कारवाईसुद्धा केली होती.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका