शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

अवकाळीने धूळधाण

By admin | Updated: March 17, 2017 00:22 IST

बीड बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा, द्राक्षांच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत.

राजेश खराडे बीडपोषक वातावरण व मुबलक पाणीसाठ्यामुळे कालपर्यंत रबी हंगामातील पिके जोमात होती. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रबीतील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा, द्राक्षांच्या फळबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. अवकाळीचा तडाखा तब्बल १२ हजार हेक्टरावरील पिकांना बसला असून, उत्पादनाबाबत शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.खरिपाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीच्याजोरावर शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून ज्वारी, बाजरी या प्रमुख पिकांसह गहू, करडई, जवस या पिकांवरही भर दिला होता. मुबलक प्रमाणात पाणीसाठा आणि मशागतीच्या जोरावर सर्वच पिके जोमात होती. रबीच्या अंतिम टप्प्याात गहू, ज्वारीची काढणी करून पिके शेतातच असताना झालेल्या पावसामुळे गहू, ज्वारी काळवंडण्याचा धोका निर्माण झाला असून आंब्याचा मोहर गळाला आहे. शिवाय, खरबूज पाण्यात भिजल्याने नासू लागले आहेत. रबी हंगामात हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिसकावला आहे. बुधवारी जिल्ह्यात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यात १०.४५, पाटोदा १०.००, अंबाजोगाई २.२०, माजलगाव १.५०, केज १५.७१, धारूर १०.६७, परळी १०.०० अशी नोंद आहे. मंडळानुसार पावसामध्ये तफावत असली तरी वादळी वाऱ्याने ज्वारीची पडझड झाली आहे. फळबागांमध्ये आंबा व द्राक्षांच्या बागा कोलमडल्या आहे. धारूर तालुक्यातील २८ गावशिवारातील १३४० हेक्टर, केज तालुक्यातील ३५०० हेक्टर, परळी तालुक्यातील ५००० हेक्टर असे जिल्हाभरातील जवळपास १५ हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही- खोतपरळी: एका दिवसाच्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता पाहून बुधवारी रात्रीच पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. परळी तालुक्यातील कौठाळी येथील मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे सदाभाऊ खोत यांनी गुरूवारी रात्री भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, तहसीलदार विद्याचरण कडवकर, तलाठी, कृषी अधिकारी यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.