शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

निरीक्षकांनी पाहिला अंत

By admin | Updated: May 17, 2014 01:15 IST

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्यास प्रचंड विलंब झाला.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल जाहीर होण्यास प्रचंड विलंब झाला. मराठवाड्यासह राज्यातील सर्वच मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच घोषित झाले. मात्र, औरंगाबादचा निकाल जाहीर होण्यास सायंकाळचे ७ वाजले. केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांमुळे हा निकाल लांबल्याचे अधिकार्‍यांनी खाजगीत बोलताना सांगितले. औरंगाबाद मतदारसंघाच्या मतमोजणीचा निकाल दुपारी १२ वाजेपर्यंत घोषित होईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र, मतमोजणीची प्रक्रिया अतिशय संथ सुरू राहिली. त्यामुळे संपूर्ण मतमोजणीस तब्बल ११ तास लागले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी सायंकाळी ७ वाजता संपली. एकूण २१ फेर्‍या झाल्या. प्रत्येक फेरीसाठी १० मिनिटे लागतील, असा हिशेब करून चार ते साडेचार तासांत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्ष सायंकाळचे ७ वाजले. त्यामुळे मोजणी कर्मचारी, उमेदवार, त्यांचे मोजणी प्रतिनिधी, पत्रकार, कार्यकर्ते, बंदोबस्तावरील पोलीस, अशा सगळ्यांची गैरसोय झाली. ११ तास थांबावे लागल्यामुळे सगळेच अक्षरश: कंटाळून गेले. दुपारी एकनंतरच बाहेर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. कडक ऊन आणि केंद्राबाहेरील अपुरी व्यवस्था, यामुळे उशीर होत होता, तसे कार्यकर्ते अस्वस्थ होत होते. अखेर सायंकाळी ७ वाजता निकाल जाहीर झाला. मराठवाड्यातील आणि राज्यातील इतर सर्व मतदारसंघांचे निकाल दुपारपर्यंतच जाहीर झाले होते. राज्यात सर्वात शेवटचा निकाल औरंगाबादचा ठरला. दरम्यान, केंद्रीय निवडणूक निरीक्षक शालिनी मिश्रा यांनी दिलेल्या सूचनांमुळेच प्रक्रिया लांबल्याचे अधिकार्‍यांनी खाजगीत सांगितले. मिश्रा यांनी पहिल्या फेरीची आकडेवारी घोषित केल्याशिवाय दुसर्‍या फेरीची मोजणी करायची नाही, अशा सूचना दिल्या. त्यामुळेच प्रत्येक फेरीनंतर पुढील फेरीची मोजणी सुरू होण्यास पाच सहा मिनिटांचा अवधी जात होता. परिणामी संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया संपण्यास सहा तासांचा अवधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी विक्रमकुमार यांना विचारले असता त्यांनी मात्र, वेगळेच कारण सांगितले. मतमोजणीसाठी आम्ही आकडेवारी नोंदविण्याकरिता कॉम्प्युटराईज व्यवस्थेबरोबरच मॅन्युअली (हाताने नोंद करणे) व्यवस्थाही केली होती.