शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचे मालमत्ता कराचे उद्दिष्ट ४५० कोटींचे वसुली ९४ कोटीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 19:05 IST

यंदा वसुलीकडे लक्ष देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच वेळ नाही.

ठळक मुद्देअकार्यक्षम प्रशासनाचा उत्तम नमुना

औरंगाबाद : दिवाळखोरीत अडकलेल्या महापालिकेला बाहेर काढण्याचे काम प्रशासनालाच करावे लागणार आहे. यासाठी मार्च महिना हा सर्वोत्तम असतो. या महिन्यात मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी सर्वाधिक भर देण्यात येतो. यंदा वसुलीकडे लक्ष देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच वेळ नाही. त्यामुळे वॉर्ड कार्यालयांमध्ये दररोज जेमतेम वसुली होत आहे. यंदा मालमत्ता कराचे उद्दिष्ट ४५० कोटी आहे. ९ मार्चपर्यंत प्रशासनाला ९४ कोटीच वसूल करता आले होते, हे विशेष.

मालमत्ता करांतर्गत थकबाकी भरल्यास त्यावरील व्याज २५ टक्के माफ करण्याची मोहीम आठ दिवसांपूर्वी सुरू केली तरीही नागरिक पैसे भरायला तयार नाहीत. ३१ मार्चसाठी आता फक्त २१ दिवस शिल्लक आहेत. मालमत्ता कराचे उद्दिष्ट यंदा ४५० कोटी ठेवले आहे. मागील ११ महिने दहा दिवसांमध्ये मनपाला फक्त ९४ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले आहे. महापालिकेच्या रेकॉर्डवर २ लाख २० हजार मालमत्ताधारक आहेत. वास्तविक पाहता मालमत्ताधारकांचा आकडा ३ लाखांपेक्षा कितीतरी जास्त आहे. महापालिकेने अलीकडेच सुरू केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १७ हजार नवीन मालमत्ता सापडल्या होत्या. १ एप्रिल २०१८ मध्ये महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ४५० कोटी ठरविले. मालमत्ताधारकांकडे थकबाकी ५५० कोटींच्या आसपास आहे. कागदावर महापालिका कोट्यधीश असली तरी तिजोरी रिकामी आहे. विकासकामे केलेल्या कंत्राटदारांना मागील नऊ महिन्यांपासून एक छदामही देण्यात आला नाही. 

कागदी उपाययोजना उत्तममालमत्ता कराची वसुली अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रशासनाने कागदावर प्रत्येक झोननिहाय वसुलीचे एक पथक नेमले. या पथकातील दोन अधिकाऱ्यांना आतापर्यंत निलंबितही करण्यात आले आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी प्रशासनाने सर्व उपाययोजना करून बघितल्या. पाहिजे तसे यश मिळायला तयार नाही. आता मनपाकडे वसुलीसाठी फक्त २१ दिवस शिल्लक आहेत. ३१ मार्चपूर्वी ४५० कोटींचे उद्दिष्ट मनपाला गाठता येईल असे वाटत नाही. 

पाणीपट्टी फक्त २१ कोटीशहरातील पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला दरवर्षी ६० ते ६५ कोटींचा खर्च येतो. त्या तुलनेत पाणीपट्टी पन्नास टक्केही वसूल होत नाही. जशी मालमत्ता कराची गत आहे, तशीच गत नळांची आहे. मनपाच्या रेकॉर्डवर दीड ते दोन लाख नळ कनेक्शनच नाहीत. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने अवघ्या २२ महिन्यांमध्ये पाणीपट्टी वसुलीपोटी ६६ कोटी रुपये वसूल केले होते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद