शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांपासून ५२ शाळांत पोषण आहार बंद

By admin | Updated: June 29, 2014 00:39 IST

उमरगा : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने ५२ शाळांमध्ये ९ हजार विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उमरगा : शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील खाजगी व जि.प. च्या २१० शाळांपैकी ५२ शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने या शाळांतील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना मागील दहा दिवसांपासून शालेय पोषण आहाराचे वाटप बंद असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.जि.प. व खाजगी शाळातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनात तांदळाची खिचडी देण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे शाळेच्या पाहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे बंधनकारक असताना जि.प. व खाजगीच्या एकूण २१० शाळांपैकी ५४ शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने शाळा सुरु झाल्यापासून मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या ५४ शाळांतील खिचडीचे वाटप बंद आहे.तालुक्यात जि.प.व खाजगीच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या एकूण १९५ शाळा आहेत. ६ वी ते ८ वी च्या एकूण १२५ शाळातील १३ हजार ६९७ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो. पहिली ते पाचवीच्या २२ हजार ८७६ विद्यार्थी याचा लाभ घेतात.पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस प्रतिदिन १०० ग्रॅम तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन १५० ग्रॅम तांदळाची खिचडी शिजवून देण्याचा नियम आहे. पहिली ते पाचवीसाठी प्रतिमहा २ हजार २८७ किलो तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहा २ हजार ५४ किलो तांदळाची गरज भासते. तालुक्यातील १ ली ते ८ वी च्या २१० शाळामधील ३६ हजार ५७३ विद्यार्थ्यांना प्रतिमहा चार हजार ५४ किलो तांदळाच्या खिचडीचे वाटप केले जाते. खिचडी शिजवून देणाऱ्या स्वयंपाक्यास विद्यार्थी संख्येप्रमाणे मानधन दिले जाते. तालुक्यातील जवळपास ५०० स्वयंपाक्यांना ५ लाख रुपयांचे प्रतिमहा मानधन दिले जाते.विद्यार्थी संख्येच्या गरजेप्रमाणे प्रत्येक शाळांना शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे वाटप करण्यात येते. मात्र तालुक्यातील ५२ शाळांकडे तांदळाची उपलब्धता नसल्याने व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शालेय पोषण आहाराच्या तांदळाची उपलब्धता होत नसल्याने ५२ शाळातील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप शाळा सुरु झाल्यापासून बंद आहे.तांदूळ शिल्लक नसलेल्या शाळांच्या मागणीप्रमाणे शालेय पोषण आहाराच्या तांदळाची मागणी संबंधितांकडे करण्यात आली असून, येत्या चार दिवसात उपलब्धता झाल्यास मागणीप्रमाणे शाळांना तांदूळ देण्यात येणार आहे.- अंकुश शिंगडे,अधीक्षक, शालेय पोषण आहार.