शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

दहा दिवसांपासून ५२ शाळांत पोषण आहार बंद

By admin | Updated: June 29, 2014 00:39 IST

उमरगा : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने ५२ शाळांमध्ये ९ हजार विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उमरगा : शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील खाजगी व जि.प. च्या २१० शाळांपैकी ५२ शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने या शाळांतील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना मागील दहा दिवसांपासून शालेय पोषण आहाराचे वाटप बंद असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.जि.प. व खाजगी शाळातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनात तांदळाची खिचडी देण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे शाळेच्या पाहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे बंधनकारक असताना जि.प. व खाजगीच्या एकूण २१० शाळांपैकी ५४ शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने शाळा सुरु झाल्यापासून मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या ५४ शाळांतील खिचडीचे वाटप बंद आहे.तालुक्यात जि.प.व खाजगीच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या एकूण १९५ शाळा आहेत. ६ वी ते ८ वी च्या एकूण १२५ शाळातील १३ हजार ६९७ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो. पहिली ते पाचवीच्या २२ हजार ८७६ विद्यार्थी याचा लाभ घेतात.पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस प्रतिदिन १०० ग्रॅम तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन १५० ग्रॅम तांदळाची खिचडी शिजवून देण्याचा नियम आहे. पहिली ते पाचवीसाठी प्रतिमहा २ हजार २८७ किलो तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहा २ हजार ५४ किलो तांदळाची गरज भासते. तालुक्यातील १ ली ते ८ वी च्या २१० शाळामधील ३६ हजार ५७३ विद्यार्थ्यांना प्रतिमहा चार हजार ५४ किलो तांदळाच्या खिचडीचे वाटप केले जाते. खिचडी शिजवून देणाऱ्या स्वयंपाक्यास विद्यार्थी संख्येप्रमाणे मानधन दिले जाते. तालुक्यातील जवळपास ५०० स्वयंपाक्यांना ५ लाख रुपयांचे प्रतिमहा मानधन दिले जाते.विद्यार्थी संख्येच्या गरजेप्रमाणे प्रत्येक शाळांना शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे वाटप करण्यात येते. मात्र तालुक्यातील ५२ शाळांकडे तांदळाची उपलब्धता नसल्याने व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शालेय पोषण आहाराच्या तांदळाची उपलब्धता होत नसल्याने ५२ शाळातील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप शाळा सुरु झाल्यापासून बंद आहे.तांदूळ शिल्लक नसलेल्या शाळांच्या मागणीप्रमाणे शालेय पोषण आहाराच्या तांदळाची मागणी संबंधितांकडे करण्यात आली असून, येत्या चार दिवसात उपलब्धता झाल्यास मागणीप्रमाणे शाळांना तांदूळ देण्यात येणार आहे.- अंकुश शिंगडे,अधीक्षक, शालेय पोषण आहार.