शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

दहा दिवसांपासून ५२ शाळांत पोषण आहार बंद

By admin | Updated: June 29, 2014 00:39 IST

उमरगा : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने ५२ शाळांमध्ये ९ हजार विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

उमरगा : शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील खाजगी व जि.प. च्या २१० शाळांपैकी ५२ शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने या शाळांतील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना मागील दहा दिवसांपासून शालेय पोषण आहाराचे वाटप बंद असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.जि.प. व खाजगी शाळातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनात तांदळाची खिचडी देण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे शाळेच्या पाहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे बंधनकारक असताना जि.प. व खाजगीच्या एकूण २१० शाळांपैकी ५४ शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने शाळा सुरु झाल्यापासून मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या ५४ शाळांतील खिचडीचे वाटप बंद आहे.तालुक्यात जि.प.व खाजगीच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या एकूण १९५ शाळा आहेत. ६ वी ते ८ वी च्या एकूण १२५ शाळातील १३ हजार ६९७ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो. पहिली ते पाचवीच्या २२ हजार ८७६ विद्यार्थी याचा लाभ घेतात.पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस प्रतिदिन १०० ग्रॅम तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन १५० ग्रॅम तांदळाची खिचडी शिजवून देण्याचा नियम आहे. पहिली ते पाचवीसाठी प्रतिमहा २ हजार २८७ किलो तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहा २ हजार ५४ किलो तांदळाची गरज भासते. तालुक्यातील १ ली ते ८ वी च्या २१० शाळामधील ३६ हजार ५७३ विद्यार्थ्यांना प्रतिमहा चार हजार ५४ किलो तांदळाच्या खिचडीचे वाटप केले जाते. खिचडी शिजवून देणाऱ्या स्वयंपाक्यास विद्यार्थी संख्येप्रमाणे मानधन दिले जाते. तालुक्यातील जवळपास ५०० स्वयंपाक्यांना ५ लाख रुपयांचे प्रतिमहा मानधन दिले जाते.विद्यार्थी संख्येच्या गरजेप्रमाणे प्रत्येक शाळांना शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे वाटप करण्यात येते. मात्र तालुक्यातील ५२ शाळांकडे तांदळाची उपलब्धता नसल्याने व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शालेय पोषण आहाराच्या तांदळाची उपलब्धता होत नसल्याने ५२ शाळातील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप शाळा सुरु झाल्यापासून बंद आहे.तांदूळ शिल्लक नसलेल्या शाळांच्या मागणीप्रमाणे शालेय पोषण आहाराच्या तांदळाची मागणी संबंधितांकडे करण्यात आली असून, येत्या चार दिवसात उपलब्धता झाल्यास मागणीप्रमाणे शाळांना तांदूळ देण्यात येणार आहे.- अंकुश शिंगडे,अधीक्षक, शालेय पोषण आहार.