शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादहून रेल्वेंची संख्या वाढली, मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:46 IST

Aurangabad Railway Station : सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या.

ठळक मुद्देऔरंगाबादहून २४ रेल्वेंची ये-जा  रेल्वेस्टेशन पुन्हा गजबजलेकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रवासावर भर

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : लाॅकडाऊनमुळे कधी नव्हे इतकी शांतता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ( Aurangabad Railway Station ) अनुभवास आली. मात्र, अनलाॅक होताच एक-एक रेल्वे सुरू होत गेली. आजघडीला औरंगाबादहून दररोज, साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, आठवड्यातून तीन दिवस आणि पाच दिवस धावणाऱ्या अशा २४ रेल्वेंची ये-जा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही वाढली असून, मुंबई मार्गावर सध्या सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. ( The number of trains increased in Aurangabad) 

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लाॅकडाऊन लावण्यात आल्याने देशभरातील सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या. औरंगाबादमार्गे धावणाऱ्या २४ पैकी ११ रेल्वे या रोज धावतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही ( Railway Passenger ) वाढली आहे. त्यामुळे रेल्वे येण्याच्या वेळेत प्लॅटफाॅर्म पुन्हा एकदा प्रवाशांनी भरलेले पाहायला मिळत आहे. प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीही वाढली आहे.

या रेल्वेंना प्रवाशांची गर्दीऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या सर्वाधिक गर्दी ही मुंबईच्या रेल्वेंना होत आहे. तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सचखंड एक्स्प्रेसलाही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची सध्या कोरोना चाचणी केली जाते.

रोज ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीकोरोना प्रादुर्भावामुळे काही कालावधीत प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली असून, दररोज ३०० तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष, सोशल डिस्टन्स अशक्यरेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्स पाळणे प्रवाशांना अशक्य होत आहे. रेल्वे आल्यावर बोगीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. कोरोना प्रादुर्भावाची पर्वा न करता अनेक जण मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.

तोंड धुण्यासाठी मास्क काढलापरभणीवरून औरंगाबादपर्यंतचा प्रवास रेल्वेने केला. रेल्वेतून उतरल्यानंतर तोंड धुण्यासाठी मास्क काढला. लगेच मास्क लावला.- विशाल भंडारे, प्रवासी

रेल्वे प्रवासात मास्क मिळावाघाईगडबडीत मास्क कुठेतरी पडला. प्रवासात मास्क मिळण्याची कुठेही सुविधा दिसून आली नाही. प्रवासात मास्क मिळाला पाहिजे.- एक प्रवासी

सध्या सुरू असलेल्या रेल्वे :- सचखंड एक्स्प्रेस- नंदीग्राम एक्स्प्रेस- देवगिरी एक्स्प्रेस- जनशताब्दी एक्स्प्रेस- तपोवन एक्स्प्रेस- अजंता एक्स्प्रेस- रेणीगुंठा एक्स्प्रेस- मराठवाडा एक्स्प्रेस-नांदेड-राेटेगाव डेमू- औरंगाबाद-हैदराबाद विशेष रेल्वे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनMumbaiमुंबईRailway Passengerरेल्वे प्रवासी