शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

औरंगाबादहून रेल्वेंची संख्या वाढली, मुंबई मार्गावर सर्वाधिक गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:46 IST

Aurangabad Railway Station : सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या.

ठळक मुद्देऔरंगाबादहून २४ रेल्वेंची ये-जा  रेल्वेस्टेशन पुन्हा गजबजलेकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रवासावर भर

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : लाॅकडाऊनमुळे कधी नव्हे इतकी शांतता औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर ( Aurangabad Railway Station ) अनुभवास आली. मात्र, अनलाॅक होताच एक-एक रेल्वे सुरू होत गेली. आजघडीला औरंगाबादहून दररोज, साप्ताहिक, द्विसाप्ताहिक, आठवड्यातून तीन दिवस आणि पाच दिवस धावणाऱ्या अशा २४ रेल्वेंची ये-जा होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही वाढली असून, मुंबई मार्गावर सध्या सर्वाधिक गर्दी पाहायला मिळत आहे. ( The number of trains increased in Aurangabad) 

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लाॅकडाऊन लावण्यात आल्याने देशभरातील सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या. तब्बल दोन महिन्यांनंतर सर्वप्रथम १ जून २०२० रोजी सचखंड एक्स्प्रेस सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यांत अन्य रेल्वे सुरू करण्यात आल्या. औरंगाबादमार्गे धावणाऱ्या २४ पैकी ११ रेल्वे या रोज धावतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रवाशांची संख्याही ( Railway Passenger ) वाढली आहे. त्यामुळे रेल्वे येण्याच्या वेळेत प्लॅटफाॅर्म पुन्हा एकदा प्रवाशांनी भरलेले पाहायला मिळत आहे. प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीही वाढली आहे.

या रेल्वेंना प्रवाशांची गर्दीऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या सर्वाधिक गर्दी ही मुंबईच्या रेल्वेंना होत आहे. तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सचखंड एक्स्प्रेसलाही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची सध्या कोरोना चाचणी केली जाते.

रोज ३०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्रीकोरोना प्रादुर्भावामुळे काही कालावधीत प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री सुरू करण्यात आली असून, दररोज ३०० तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष, सोशल डिस्टन्स अशक्यरेल्वे प्रवासात सोशल डिस्टन्स पाळणे प्रवाशांना अशक्य होत आहे. रेल्वे आल्यावर बोगीत चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. कोरोना प्रादुर्भावाची पर्वा न करता अनेक जण मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले.

तोंड धुण्यासाठी मास्क काढलापरभणीवरून औरंगाबादपर्यंतचा प्रवास रेल्वेने केला. रेल्वेतून उतरल्यानंतर तोंड धुण्यासाठी मास्क काढला. लगेच मास्क लावला.- विशाल भंडारे, प्रवासी

रेल्वे प्रवासात मास्क मिळावाघाईगडबडीत मास्क कुठेतरी पडला. प्रवासात मास्क मिळण्याची कुठेही सुविधा दिसून आली नाही. प्रवासात मास्क मिळाला पाहिजे.- एक प्रवासी

सध्या सुरू असलेल्या रेल्वे :- सचखंड एक्स्प्रेस- नंदीग्राम एक्स्प्रेस- देवगिरी एक्स्प्रेस- जनशताब्दी एक्स्प्रेस- तपोवन एक्स्प्रेस- अजंता एक्स्प्रेस- रेणीगुंठा एक्स्प्रेस- मराठवाडा एक्स्प्रेस-नांदेड-राेटेगाव डेमू- औरंगाबाद-हैदराबाद विशेष रेल्वे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनMumbaiमुंबईRailway Passengerरेल्वे प्रवासी