शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वेची स्थिती पूर्वपदावर येत आहे. औरंगाबादहून धावणाऱ्या रेल्वेंची संख्याही ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर रेल्वेची स्थिती पूर्वपदावर येत आहे. औरंगाबादहून धावणाऱ्या रेल्वेंची संख्याही आता वाढली आहे. मात्र, रेल्वेचे थांबे काही केल्या वाढत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची कसरत प्रवाशांना करावी लागत आहे.

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनला ‘डी’ दर्जा मिळाला. त्यामुळे येथे सोयीसुविधा वाढविण्यात आल्या. या ठिकाणी रेल्वे आरक्षण तिकीट देण्याची सुविधाही देण्यात आली आहे, मात्र, आजघडीला याठिकाणी दोनच रेल्वे थांबतात. अन्य रेल्वे थांबण्याची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच करावी लागत आहे. अगदी काही अंतरावर रेल्वेस्टेशन असूनही मुकुंदवाडी, सिडको, चिकलठाणा भागातील हजारो नागरिकांना १५ किलोमीटर अंतरावरील मुख्य रेल्वेस्टेशन गाठावे लागत आहे. नांदेड विभागासह दक्षिण मध्य रेल्वे विभागात अनेक ठिकाणी दोन रेल्वे स्टेशनमध्ये अंतर कमी असतानाही, त्या ठिकाणी एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा दिलेला आहे. तरीही मुकुंदवाडी स्टेशनवर जनशताब्दी, तपोवन यासारख्या एक्स्प्रेस रेल्वेंना थांबा मिळत नसल्याची स्थिती आहे.

लासूर स्टेशन, रोटेगाव येथील प्रवाशांना जनशताब्दी, सचखंड एक्स्प्रेससाठी औरंगाबाद रेल्वेस्टेशन गाठावे लागते. या दोन्ही ठिकाणी या रेल्वे थांबविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे संतोषकुमार सोमाणी, नमो रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गौतम नाहाट, राजकुमार सोमाणी यांनी केली आहे.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

- सचखंड एक्स्प्रेस

- नंदीग्राम एक्स्प्रेस

- देवगिरी एक्स्प्रेस

- जनशताब्दी एक्स्प्रेस

- तपोवन एक्स्प्रेस

- अजंता एक्स्प्रेस

- रेणीगुंठा एक्स्प्रेस

- मराठवाडा एक्स्प्रेस

----

याठिकाणी कधी थांबणार रेल्वे ?

- शहरातील चिकलठाणा स्टेशनवर आजघडीला रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे थांबते. तर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर फक्त औरंगाबाद- हैदराबाद आणि मराठवाडा एक्स्प्रेस थांबते. याठिकाणी अन्य एक्स्प्रेस थांबविण्याची मागणी आहे.

- मुकुंदवाडी स्टेशनवर प्रामुख्याने जनशताब्दी, तपोवन, नंदीग्राम एक्स्प्रेस थांबविण्याची मागणी प्रवाशांतून हाेत आहे. लासूर स्टेशन, रोटेगाव येथे नरसापूर-नगरसोल आणि जनशताब्दी, सचखंड एक्स्प्रेस थांबविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

-----

वरिष्ठ पातळीवर निर्णय

मुकुंदवाडी स्टेशनवर दोन, तर चिकलठाणा स्टेशनवर एक रेल्वे सध्या थांबते. रेल्वेगाड्यांना थांबे देण्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. त्यामुळे यासंदर्भात अधिक माहिती देता येणार नाही, असे रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

-----

थांबा नसल्याने आम्हांला होतोय त्रास

रेल्वेंना थांबा द्यावा

घरापासून अगदी काही अंतरावर मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन आहे. परंतु तेथे दोनच रेल्वे थांबतात. त्यामुळे मुख्य रेल्वेस्टेशनवर जावे लागते. याठिकाणी अन्य एक्स्प्रेस रेल्वेंनाही थांबा दिला पाहिजे.

- देवराज खिल्लारे, प्रवासी

-----

फक्त आश्वासने

मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर तपोवन एक्स्प्रेस थांबविली जाईल, असे आश्वासन दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिले होते. परंतु, अजूनही त्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे. जनशताब्दी, नंदिग्राम एक्स्प्रेसलाही येथे थांबा मिळाला पाहिजे.

- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती