शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

टँकरची संख्या ११ ने घटली

By admin | Updated: August 4, 2014 01:57 IST

औरंगाबाद : पावसाळ्यातही सातत्याने वर चढत असलेला पाणीपुरवठ्याच्या टँकरचा आलेख आता खाली येण्यास सुरुवात झाली आहे.

 जिल्ह्यातील टँकरची संख्या चालू आठवड्यात ११ ने कमी होऊन ३२२ वर आली आहे. सिल्लोड तालुक्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तेथील टँकर कमी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने तेव्हापासून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. मे अखेरीस वाढली टंचाईग्रस्त गावांची संख्या मेअखेरीस टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्यामुळे टँकरची संख्याही दोनशेवर पोहोचली. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर ही संख्या कमी होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे पाणीटंचाई परिस्थिती आणखी गंभीर झाली. त्यामुळे मागील आठवड्यापर्यंत दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढतच होती. जुलैअखेरीस टँकरची संख्या ३३३ वर पोहोचली होती. मात्र, आता चालू आठवड्यात ही संख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सिल्लोड तालुक्यातील अंभईसह काही मंडळांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे प्रशासनाने या भागातील ११ टँकर कमी केले आहेत. परिणामी चालू आठवड्यात टँकरची संख्या ३२२ पर्यंत खाली आली आहे.