शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

औरंगाबादमध्ये अपु-या शहर बसमुळे सहा वर्षात खाजगी वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:36 IST

शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

ठळक मुद्देशहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादने स्मार्ट सिटीत पाऊल टाकले आणि शहराच्या विकास, विस्ताराची चाके गतिमान झाली. परंतु गेल्या काही वर्षांत शहर बसची ‘चाके ’ जाम झाली आहेत. शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

शहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. औरंगाबाद शहराचा आज चारही बाजूंनी विस्तार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक अंतर ये-जा करावी लागते. तासन्तास थांबूनही शहर बस येत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांचा वापर केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे वाहन खरेदीकडे कल वाढला. 

आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे. यामध्ये शहरातील वाहनांची नोंद सर्वाधिक आहे. शहर बससेवा समक्ष असेल तर किफायतशीर प्रवासाला प्राधान्य दिल्या जाते. परंतु गेली अनेक वर्षे शहर बसची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात खाजगी वाहतुकीचा वापर करणे अनिवार्यच झाले. त्यातून शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातून रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणाचाही ताण वाढला.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी करून दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांची संख्या वाढीला एकप्रकारे हातभार लावण्यात आला. गेली अनेक वर्षे हेतूपुरस्सर शहर बससेवा सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झाले. शहर बससेवा अपुरी असल्याने आता आणखी एका नव्या प्रकारचे प्रवासी वाहन शहरात दाखल होत असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावरील खर्च वाढला आहे. औरंगाबादेत दररोज सुमारे ३ लाख लिटर पेट्रोल तर सुमारे २ लाख डिझेलची विक्री होते, अशी माहिती औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी दिली. दुचाकी, रिक्षांमध्ये इंधन विक्रीचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे शहर परिसराचे वातावरण प्रदूषित होण्यासही हातभार लागत आहे. 

सहा वर्षांत दुपटीने वाढ२००९-१० यादरम्यान जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार २७ इतकी होती. अवघ्या सहा वर्षांत ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील वाहनांची संख्या ११ लाख २ हजार ४४४ वर जाऊन पोहोचली. त्यानंतर एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान ७३ हजार वाहनांची भर पडली. तर एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ६० हजार ९३६ नव्या वाहनांची भर पडली आहे. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १२ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या शहरातील रस्त्यांवर ७ लाखांवर वाहने धावत आहेत.