शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

औरंगाबादमध्ये अपु-या शहर बसमुळे सहा वर्षात खाजगी वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 19:36 IST

शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

ठळक मुद्देशहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादने स्मार्ट सिटीत पाऊल टाकले आणि शहराच्या विकास, विस्ताराची चाके गतिमान झाली. परंतु गेल्या काही वर्षांत शहर बसची ‘चाके ’ जाम झाली आहेत. शहरात मागील दहा वर्षांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महामंडळाकडून सुरू असलेली शहर बससेवा नावालाच आहे. या अवस्थेमुळे शहरात दुचाकी, चारचाकी, रिक्षांसह खाजगी वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली.

शहरातील वाहनांची संख्या वाढण्यामागे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसणे हे प्रमुख कारण मानले जाते. औरंगाबाद शहराचा आज चारही बाजूंनी विस्तार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिक अंतर ये-जा करावी लागते. तासन्तास थांबूनही शहर बस येत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांचा वापर केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे वाहन खरेदीकडे कल वाढला. 

आरटीओ कार्यालयात दरवर्षी जवळपास एक लाख नव्या वाहनांची नोंद होत आहे. यामध्ये शहरातील वाहनांची नोंद सर्वाधिक आहे. शहर बससेवा समक्ष असेल तर किफायतशीर प्रवासाला प्राधान्य दिल्या जाते. परंतु गेली अनेक वर्षे शहर बसची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात खाजगी वाहतुकीचा वापर करणे अनिवार्यच झाले. त्यातून शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. त्यातून रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रणाचाही ताण वाढला.

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी करून दुचाकी, चारचाकी आणि रिक्षांची संख्या वाढीला एकप्रकारे हातभार लावण्यात आला. गेली अनेक वर्षे हेतूपुरस्सर शहर बससेवा सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झाले. शहर बससेवा अपुरी असल्याने आता आणखी एका नव्या प्रकारचे प्रवासी वाहन शहरात दाखल होत असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.वाहनांची संख्या वाढल्याने इंधनावरील खर्च वाढला आहे. औरंगाबादेत दररोज सुमारे ३ लाख लिटर पेट्रोल तर सुमारे २ लाख डिझेलची विक्री होते, अशी माहिती औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी दिली. दुचाकी, रिक्षांमध्ये इंधन विक्रीचे प्रमाण अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे शहर परिसराचे वातावरण प्रदूषित होण्यासही हातभार लागत आहे. 

सहा वर्षांत दुपटीने वाढ२००९-१० यादरम्यान जिल्ह्यातील वाहनांची संख्या ५ लाख ८३ हजार २७ इतकी होती. अवघ्या सहा वर्षांत ३१ मार्च २०१६ पर्यंत जिल्ह्यातील वाहनांची संख्या ११ लाख २ हजार ४४४ वर जाऊन पोहोचली. त्यानंतर एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ दरम्यान ७३ हजार वाहनांची भर पडली. तर एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ६० हजार ९३६ नव्या वाहनांची भर पडली आहे. जिल्ह्यातील वाहनांची संख्या १२ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या शहरातील रस्त्यांवर ७ लाखांवर वाहने धावत आहेत.