शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

शहरातुन बेपत्ता व्यक्तींची संख्या वाढली, १६ दिवसांमध्ये १५ जणांचे घरातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:02 IST

राम शिनगारे औरंगाबाद : शहर पोलीस हद्दीतून व्यक्ती बेपत्ता होण्याची संख्या मागील १५ दिवसांमध्ये अचानक वाढली आहे. १६ दिवसांमध्ये ...

राम शिनगारे

औरंगाबाद : शहर पोलीस हद्दीतून व्यक्ती बेपत्ता होण्याची संख्या मागील १५ दिवसांमध्ये अचानक वाढली आहे. १६ दिवसांमध्ये तब्बल १५ जण घर सोडून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात सहा महिलांचा समावेश आहे. त्याचवेळी चार अनोळखी व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. शहरातील पोलीस ठाण्यांनी 'लोकमत'ला ही माहिती पाठविली आहे.

शहरात १ ऑगस्टपासून सहा महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नातेवाइकांनी नोंदविल्या आहेत. यात दौलताबाद येथील मनोजकुमार पंकजलाल राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण नीतूसिंग राजसिंग राजपूत (वय २६) ही २ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली. विष्णुनगरातील श्वेता कृष्णा पवार (२०) ही सुद्धा २ ऑगस्ट रोजी दवाखान्यात जाते असे सांगून घरातून गायब झाली. याविषयी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. कीर्ती सचिन वाघ (३७) या घरातून १५ हजार रुपये घेऊन नाशिकला माझ्या घरी जायचे असे म्हणून ३० जुलैला घराबाहेर पडल्या. त्या बेपत्ता झाल्याची नोंद क्रांतीचौक पाेलीस ठाण्यात आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार राजश्री ऊर्फ आयेशा छत्रपाल मानसिंह भघेल (३३) या ५ ऑगस्ट रोजी घरातून निघुन गेल्या. लक्ष्मी प्रकाश लोखंडे (३०) या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन २ ऑगस्ट रोजी सकाळीच घराबाहेर पडल्या. याविषयी उस्मानपुरा पोलिसांत नोंद करण्यात आलेली आहे. सातारा पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार पूजा विजय हिरे (२९) या एक मुलगी व मुलगा सोबत घेऊन १६ ऑगस्ट रोजी निघून गेल्या आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या महिलांशिवाय इतर ९ व्यक्तीही मागील १६ दिवसांत निघून गेल्या आहेत. रोहित रतन कोठावळे (२२), कृष्णा मनोहर वीर (२६), अभिषेक आप्पासाहेब आंधळे (१७), दीपक विलास गुंजाळ (३०), पंढरीनाथ शंकर तांगडे (७०), पवन जगन्नाथ बोधक (४१), विनोद सुधाकर कापुरे (५२), शेख जाकेर शेख हमीद (३८) आणि पद्माकर अशोक कुलकर्णी (४४) हे घरातून निघून गेल्याच्या नोंदी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आलेल्या आहेत. मागील १६ दिवसांमधील या घटनांमुळे पोलीस दलातही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये चार अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम विविध स्तरावर करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चौकट,

व्यक्तिगत कारणातून हे प्रकार

बेपत्ता होण्याचे प्रकार हे व्यक्तिगत कारणातून होत असतात. त्यात संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील परिस्थिती, वर्तन जबाबदार असते. प्रेम, कौटुंबिक कलह यातून हे प्रकार वाढत आहेत. त्यावर व्यापक प्रमाणात जनजागृती आणि कुटुंबस्तरावरच समस्या सोडविणे गरजेचे आहे.

- रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा