शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातुन बेपत्ता व्यक्तींची संख्या वाढली, १६ दिवसांमध्ये १५ जणांचे घरातून पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:02 IST

राम शिनगारे औरंगाबाद : शहर पोलीस हद्दीतून व्यक्ती बेपत्ता होण्याची संख्या मागील १५ दिवसांमध्ये अचानक वाढली आहे. १६ दिवसांमध्ये ...

राम शिनगारे

औरंगाबाद : शहर पोलीस हद्दीतून व्यक्ती बेपत्ता होण्याची संख्या मागील १५ दिवसांमध्ये अचानक वाढली आहे. १६ दिवसांमध्ये तब्बल १५ जण घर सोडून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात सहा महिलांचा समावेश आहे. त्याचवेळी चार अनोळखी व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. शहरातील पोलीस ठाण्यांनी 'लोकमत'ला ही माहिती पाठविली आहे.

शहरात १ ऑगस्टपासून सहा महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये नातेवाइकांनी नोंदविल्या आहेत. यात दौलताबाद येथील मनोजकुमार पंकजलाल राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची बहीण नीतूसिंग राजसिंग राजपूत (वय २६) ही २ ऑगस्ट रोजी घरातून निघून गेली. विष्णुनगरातील श्वेता कृष्णा पवार (२०) ही सुद्धा २ ऑगस्ट रोजी दवाखान्यात जाते असे सांगून घरातून गायब झाली. याविषयी जवाहरनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. कीर्ती सचिन वाघ (३७) या घरातून १५ हजार रुपये घेऊन नाशिकला माझ्या घरी जायचे असे म्हणून ३० जुलैला घराबाहेर पडल्या. त्या बेपत्ता झाल्याची नोंद क्रांतीचौक पाेलीस ठाण्यात आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार राजश्री ऊर्फ आयेशा छत्रपाल मानसिंह भघेल (३३) या ५ ऑगस्ट रोजी घरातून निघुन गेल्या. लक्ष्मी प्रकाश लोखंडे (३०) या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन २ ऑगस्ट रोजी सकाळीच घराबाहेर पडल्या. याविषयी उस्मानपुरा पोलिसांत नोंद करण्यात आलेली आहे. सातारा पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार पूजा विजय हिरे (२९) या एक मुलगी व मुलगा सोबत घेऊन १६ ऑगस्ट रोजी निघून गेल्या आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. या महिलांशिवाय इतर ९ व्यक्तीही मागील १६ दिवसांत निघून गेल्या आहेत. रोहित रतन कोठावळे (२२), कृष्णा मनोहर वीर (२६), अभिषेक आप्पासाहेब आंधळे (१७), दीपक विलास गुंजाळ (३०), पंढरीनाथ शंकर तांगडे (७०), पवन जगन्नाथ बोधक (४१), विनोद सुधाकर कापुरे (५२), शेख जाकेर शेख हमीद (३८) आणि पद्माकर अशोक कुलकर्णी (४४) हे घरातून निघून गेल्याच्या नोंदी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आलेल्या आहेत. मागील १६ दिवसांमधील या घटनांमुळे पोलीस दलातही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये चार अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम विविध स्तरावर करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चौकट,

व्यक्तिगत कारणातून हे प्रकार

बेपत्ता होण्याचे प्रकार हे व्यक्तिगत कारणातून होत असतात. त्यात संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील परिस्थिती, वर्तन जबाबदार असते. प्रेम, कौटुंबिक कलह यातून हे प्रकार वाढत आहेत. त्यावर व्यापक प्रमाणात जनजागृती आणि कुटुंबस्तरावरच समस्या सोडविणे गरजेचे आहे.

- रवींद्र साळोखे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा