शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

मनपा, जीटीएलमधील ‘तो’ करार अखेर रद्द!

By admin | Updated: May 31, 2014 01:25 IST

औरंगाबाद : शहरातील विकास आराखड्यात येणार्‍या १४ रस्त्यांतील विद्युत खांब व डीपी काढण्यासाठी मनपाने जीटीएलबरोबर केलेला करार आज रद्द झाला.

औरंगाबाद : शहरातील विकास आराखड्यात येणार्‍या १४ रस्त्यांतील विद्युत खांब व डीपी काढण्यासाठी मनपाने जीटीएलबरोबर केलेला करार आज रद्द झाला. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, उपअभियंता पी. आर. बनसोडे, जीटीएलचे जगदीश चेलारमाणी, अभिजित देशपांडे, प्रशांत मजुमदार, दिलीप घोडके यांच्यातील बैठकीअंती हा निर्णय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आणि जीटीएलच्या कार्यालयात दोन बैठकी झाल्या. यापुढे रस्त्यांत अडथळा निर्माण करणारे जीटीएलचे खांब पालिकेच्या यंत्रणेकडून काढण्यात येणार आहेत. २०१२ पासून जीटीएलकडे विद्युत खांब काढण्याचे काम दिले. मात्र, कंपनीकडून त्यातील अर्धे काम पूर्ण झाले. आता पालिका स्वत:हून टेंडर काढून रस्त्यांतील खांब हटविणार आहे. त्यासाठी जीटीएलचा एक विभागीय स्तरावरील अधिकारी सुपरव्हिजनसाठी मनपाला देण्यात येईल. लोटाकारंजा आणि कैलासनगर या रस्त्यांतील खांब काढण्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. लोटाकारंजा रस्त्यातील खांब काढण्यासाठी जीटीएल खर्च अंदाजपत्रक पालिकेला सादर करील. त्यानुसार पालिका ते काम करणार आहे. कैलासनगर ते लक्ष्मण चावडी या रस्त्यातील खांब काढण्यासाठी कंत्राटदार एन. बी. कुलकर्णी यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जीटीएल कंपनी त्यांना एबी केबल उपलब्ध करून देणार आहे. १४ विकास आराखड्यातील ६ रस्त्यांवरील खांब जीटीएलने काढले. यापुढे जीटीएल सुपरव्हिजन करील. मनपा टेंडर काढून खाजगी ठेकेदारांकडून ते खांब हटविणार आहे. वेळोवेळी शटडाऊन घेण्यासाठी इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर पालिकेच्या सेवेत देण्यात येईल. मनपाने जीटीएलला दिले २ कोटी रुपये मनपाने जीटीएलला दिले. १२ कोटी ७६ लाख रुपयांमध्ये ५०० खांब काढण्याच्या वाटाघाटी कंपनीबरोबर झाल्या होत्या.