शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

अपंगासाठी आता तीन टक्के निधी

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

उस्मानाबाद :आता पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या (सेस) अर्थसंकल्पात ३ टक्के निधी अपंग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेप्रमाणेच आता पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या (सेस) अर्थसंकल्पात ३ टक्के निधी अपंग व्यक्तींचे कल्याण व पुनर्वसनासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी व जि.प. अध्यक्षांना देण्यात आले आहेत.अपंग कल्याण कृती आराखड्यामध्ये रोजगार व स्वयंरोजगार विषयक उपाययोजनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय योजना, केंद्र शासनाच्या योजना आणि दारिद्र्य निर्मूलन योजनेंतर्गत किमान ३ टक्के लाभार्थी अपंग असावेत, असे स्पष्ट निर्देश आहेत. तसेच अपंगाचे कल्याण व पुनर्वसनाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी हा अपंगांसाठी राखून ठेवावा, असेही निर्देशित करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेसोबतच आता पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यांनीसुद्धा जिल्हा परिषदेप्रमाणेच त्यांच्या स्वनिधीतून अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनाकरिता ३ टक्के निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सदरील ३ टक्के निधी हा अपंगाच्या कल्याणासाठीच खर्च करावा, असे स्पष्टपणे म्हटले आहे. हा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सुपूर्द करण्याबाबतही सांगण्यात आले आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना त्यात एकूण लाभार्थ्यांपैकी ३ टक्के लाभार्थी हे अपंग प्रवर्गातील असणे बंधनकारक केले आहे. (प्रतिनिध्ाी)