शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

आता ‘स्विस’आराखडा

By admin | Updated: December 17, 2015 00:18 IST

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यासाठी कामाने गती घेतली आहे.

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चाळीसगाव (औट्रम) घाटात राज्यातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यासाठी कामाने गती घेतली आहे. डोंगर पोखरून तयार करण्यात येणाऱ्या या बोगद्यातून एकाच वेळी वाहने व रेल्वे येईल-जाईल. याचा संपूर्ण आराखडा तयार करण्याचे कंत्राट स्वित्झर्लंड येथील अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटानुसार पुढील सहा महिन्यांत कंपनीने सर्व आराखडा तयार करून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय) कडे सुपूर्द करायचा आहे. औरंगाबाद-धुळे या ४५२ कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कन्नडजवळील चाळीसगाव घाट होय. येथील डोंगर पोखरून ७ कि.मी.चा मोठा बोगदा तयार करण्याचे काम एनएचएआयसमोरील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. या बोगद्यातून मालवाहतूक, प्रवासी वाहनेच नव्हे तर आता रेल्वेसुद्धा जाणार आहे, असे नियोजन केले जात आहे. यामुळे मराठवाड्याला मुंबई-दिल्ली आणि मुंबई-कोलकाता रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी १५० कि. मी. वरील मनमाडला जाण्याची गरज राहणार नाही. सध्या मनमाडसाठी तीन तास लागतात. नव्या प्रस्तावित रेल्वेमार्गाने अवघ्या ७० कि. मी. चा प्रवास करताच औरंगाबाद मध्य रेल्वेशी जोडला जाईल. त्यामुळे चाळीसगाव घाटाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या बोगद्याचा आराखडा तयार करण्यासाठी चार आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट कंपन्यांनी आपल्या निविदा दाखल केल्या होत्या. त्यात स्वित्झर्लंड येथील अ‍ॅम्बर्ग इंजिनिअरिंग या कंपनीने बाजी मारत निविदा आपल्या नावावर केली. कंत्राटानुसार संबंधित कंपनीला पुढील ६ महिन्यांत संपूर्ण बोगदा, पूल, रस्ता असा १४ कि. मी. चा आराखडा तयार करून द्यायचा आहे. बोगद्याच्या कामाची निविदा काढण्यापासून ते प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंतची जबाबदारी कंपनीवर टाकण्यात आली आहे. एनएचएआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वित्झर्लंडच्या कंपनीकडून आराखडा मिळाल्यानंतर तो मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रालयात पाठविण्यात येईल. मंजुरी मिळणे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ६ महिन्यांनंतर लगेच बोगद्याच्या कामाला सुरुवात होईल. बोगदा तयार करण्यासाठी जपान सरकारने भारत सरकारला १४०० कोटी रुपये दिले आहेत. या बोगद्यास १७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उर्वरित रक्कम केंद्र सरकार देणार आहे.