शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या समांतर जलवाहिनीसाठी आता शनिअमावास्येचा मुहुर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:34 IST

समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीची हकालपट्टी करणारे ११५ नगरसेवक मागील काही दिवसांपासून पुन्हा कंपनीला आणण्यासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरूण बसले आहेत. २४ जुलैपासून कंपनीचा एकही अधिकारी राजकीय मंडळींना भेटण्यासाठी येण्यास तयार नाही. सर्वसाधारण सभेत मंजुरी द्यायची तर द्या अन्यथा नका देऊ, अशी ताठर भूमिका कंपनीने घेतल्याने महापालिकेच्या वर्तुळात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर ‘समांतर’वर चर्चा न घेता सभेत निव्वळ चालढकल करण्यात आली. समांतरसाठी शनिवारी ११ आॅगस्ट रोजी पुन्हा सभा घेण्याचे रात्री उशिरा जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देकंपनीचा ‘दूत’ येईना : आता ११ आॅगस्ट रोजी पुन्हा सर्वसाधारण सभा; महापालिका प्रशासनाची कंपनीकडून कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या कंपनीची हकालपट्टी करणारे ११५ नगरसेवक मागील काही दिवसांपासून पुन्हा कंपनीला आणण्यासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरूण बसले आहेत. २४ जुलैपासून कंपनीचा एकही अधिकारी राजकीय मंडळींना भेटण्यासाठी येण्यास तयार नाही. सर्वसाधारण सभेत मंजुरी द्यायची तर द्या अन्यथा नका देऊ, अशी ताठर भूमिका कंपनीने घेतल्याने महापालिकेच्या वर्तुळात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोमवारी दिवसभर ‘समांतर’वर चर्चा न घेता सभेत निव्वळ चालढकल करण्यात आली. समांतरसाठी शनिवारी ११ आॅगस्ट रोजी पुन्हा सभा घेण्याचे रात्री उशिरा जाहीर करण्यात आले.औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी चांगले काम करीत नसल्याच्या आरोपावरून आॅक्टोबर २०१६ मध्ये महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाने कंपनीची हकालपट्टी केली. कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या शिवाय लवादाकडेही दावा दाखल केला. महापालिका प्रशासनाची चारही बाजूने कंपनीने कोंडी करून ठेवली आहे. मागील महिन्यात कंपनीने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा काम करण्यासाठी अटी व शर्र्तींचा प्रस्ताव मांडला. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कंपनीच्या अटी-शर्र्तींसह प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सभेसमोर ठेवला आहे. मागील दोन सर्वसाधारण सभांमध्ये समांतर जलवाहिनीच्या प्रस्तावाला मुदतवाढ देण्यात येत आहे.समांतरचे पाणी नेमके कुठे मुरत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’प्रतिनिधीने केला असता काही खळबळजनक बाबी समोर आल्या. समांतर जलवाहिनी योजना पुन्हा राबवायची की नाही याचा निर्णय ‘मातोश्री’ घेईल, असे सेनेतर्फे जाहीर करण्यात आले. मात्र, कंपनीचा एकही अधिकारी ‘मातोश्री’ सोडा; महापालिकेतही फिरकला नाही. १२०० कोटी रुपयांच्या योजनेला सहजासहजी मंजुरी कशी द्यावी, असा प्रश्न स्थानिक राजकीय मंडळींना पडला आहे. कंपनीचे अधिकारी भेटीला येण्यास अजिबात तयार नाहीत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सर्वसाधारण सभेत या विषयाची टोलवाटोलवी सुरू आहे. २४ जुलै रोजीच्या सभेत ‘समांतर’वर स्वतंत्र बैठक लावण्याचे निश्चित झाले. सोमवारी (६ आॅगस्ट) स्वतंत्र सभा बोलावण्यात आली तरीही समांतरवर अजिबात चर्चा झाली नाही. रात्री उशिरापर्यंत सर्वसाधारण सभा चालविण्यात आली. त्यानंतर आता ११ आॅगस्ट रोजी समांतरवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे महापौरांतर्फे घोषित करण्यात आले.दिल्लीतून प्रचंड दबाव४औरंगाबाद युटिलिटी कंपनीशी निगडित आणखी एका मोठ्या कंपनीचे मालक भाजपचे खासदार आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील आपले राजकीय वजन वापरून कंपनीचे काम पुन्हा सुरू करावे, यासाठी राज्य शासनावर दबाव आणला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन महिन्यांपूर्वी मुंबईत समांतरसंदर्भात बैठक घेतली. बैठकीत कंपनीचे अधिकारी, औरंगाबाद शहरातील सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते. या बैठकीत कंपनीने न्यायालयाच्या बाहेर मनपासोबत तडजोड करावी, असा निर्णय घेण्यात आला.कायद्याच्या कचाट्यात मनपा४एकीकडे कंपनीने न्यायालयाच्या बाहेर तडजोड करण्यासाठी संमती दिली. दुसरीकडे न्यायालयात तडजोडीचा अर्ज न देता भविष्यात काम करण्यासाठी मनपाने आपल्या अटी-शर्ती मान्य कराव्यात, असा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव पाहून मनपा प्रशासनाच्या पायाखालची वाळूच घसरली होती. घाईघाईत कंपनीने मांडलेला प्रस्ताव आणून आयुक्तांनी थेट सर्वसाधारण सभेसमोर ठेवला.प्रमाणिक इच्छाच नाही...४शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळावे, जायकवाडीहून कसेबसे करून मोठ्या प्रमाणात पाणी आणण्यासाठी यंत्रणा उभारावी ही प्रमाणिक इच्छा मनपाची नाही. भविष्यात कंपनीला शहरात मनपाने आणले तर कंपनी सेवा देण्याऐवजी उलट व्यवसायच करणार आहे. चार वर्षे पाणीपट्टी न वाढविता दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टी वाढविणार आहे. आज नागरिकांना ४ हजार रुपये पाणीपट्टी द्यावी लागत आहे. कंपनीला नंतर दहा हजार रुपये किमान पाणीपट्टी देण्याची वेळ येईल. कंपनीच्या या जाचक अटीकडे लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक