शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

आता परतीच्या पावसावर रबीची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:10 IST

पावसाच्या गैरहजेरीत अळीचा खरिपावर डल्ला

करमाड : पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु औरंगाबाद तालुका अद्याप कोरडाच आहे. पाऊस न झाल्याने लष्करी अळीने खरिपाचे पीक फस्त केले असून, आता परतीच्या पावसावर बळीराजाची मदार अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासाठी, रबी हंगामातील पिके, फळपिके ब पशुधन वाचवण्यासाठी परतीच्या काळात वरूण राजाने कृपा करावी, अशी आशा बळीराजाला लागून राहिली आहे.

पावसाळा अखेरच्या टप्प्यात असून, अद्याप विहिरी, नदी-नाले, धरणे कोरडी पडलेली आहेत. मात्र, परतीचा पाऊस येईल या आशेवर बळीराजा रबीची स्वप्न रंगवत आहे. औरंगाबाद तालुक्यावर अद्याप एकाही मोठ्या पावसाने हजेरी लावली नसल्याने सुखना, लहुकी, बाबूवाडी सारखे पाझर तलाव मृतसाठ्यातच आहेत.

छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पाणी वाहिले नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. शिवाय मागील वर्षी सुरु झालेली पाणीटंचाई अद्याप संपलेली नाही. सप्टेंबर महिना आर्धा संपत आला तरी एकही दमदार पाऊस झाला नाही. बाजरी व मकावर लष्करी अळीने हल्ला चढवला.

या अळीमुळे उत्पन्न तर सोडा चाराही होण्याची आशा मावळली आहे. शिवाय कमी पाण्यामुळे कपाशीला फक्त 20 टक्के कैऱ्यांची उगवण झालेली आहे. कपाशी पिकातून खर्च सुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने किमान परतीच्या पाऊस जोरदार हजेरी लावेल या आशेवर बळीराजाचे रबीचे स्वप्न रंगवत आहे. या पिकातून जनावरासाठी चारा तर होतोच शिवाय गहु, ज्वारी हे धान्यही मिळते.प् ारंतु अद्याप तरी परतीच्या पावसाकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती