शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता परतीच्या पावसावर रबीची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 17:10 IST

पावसाच्या गैरहजेरीत अळीचा खरिपावर डल्ला

करमाड : पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु औरंगाबाद तालुका अद्याप कोरडाच आहे. पाऊस न झाल्याने लष्करी अळीने खरिपाचे पीक फस्त केले असून, आता परतीच्या पावसावर बळीराजाची मदार अवलंबून आहे. पिण्याच्या पाण्यासाठी, रबी हंगामातील पिके, फळपिके ब पशुधन वाचवण्यासाठी परतीच्या काळात वरूण राजाने कृपा करावी, अशी आशा बळीराजाला लागून राहिली आहे.

पावसाळा अखेरच्या टप्प्यात असून, अद्याप विहिरी, नदी-नाले, धरणे कोरडी पडलेली आहेत. मात्र, परतीचा पाऊस येईल या आशेवर बळीराजा रबीची स्वप्न रंगवत आहे. औरंगाबाद तालुक्यावर अद्याप एकाही मोठ्या पावसाने हजेरी लावली नसल्याने सुखना, लहुकी, बाबूवाडी सारखे पाझर तलाव मृतसाठ्यातच आहेत.

छोट्या-मोठ्या नदी नाल्यांना पाणी वाहिले नसल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. शिवाय मागील वर्षी सुरु झालेली पाणीटंचाई अद्याप संपलेली नाही. सप्टेंबर महिना आर्धा संपत आला तरी एकही दमदार पाऊस झाला नाही. बाजरी व मकावर लष्करी अळीने हल्ला चढवला.

या अळीमुळे उत्पन्न तर सोडा चाराही होण्याची आशा मावळली आहे. शिवाय कमी पाण्यामुळे कपाशीला फक्त 20 टक्के कैऱ्यांची उगवण झालेली आहे. कपाशी पिकातून खर्च सुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने किमान परतीच्या पाऊस जोरदार हजेरी लावेल या आशेवर बळीराजाचे रबीचे स्वप्न रंगवत आहे. या पिकातून जनावरासाठी चारा तर होतोच शिवाय गहु, ज्वारी हे धान्यही मिळते.प् ारंतु अद्याप तरी परतीच्या पावसाकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादagricultureशेती