शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आता जबाबदारी नागरिकांची; अंशत: लॉकडाऊनद्वारे अर्थव्यवस्था आणि आरोग्य यातील सुवर्णमध्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 13:17 IST

Partialy Lockdown in Aurangabad : उद्योगचक्र सुरळीत चालावे, हातावर पोट असणाऱ्यांचे नुकसान होऊ नये. या अनुषंगाने सर्व संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती.

ठळक मुद्दे उद्योग, अर्थकारणाला तडा जाऊ नये या अनुषंगाने निर्णयउद्योग वर्तुळातून निणर्यामुळे समाधान

औरंगाबाद : जिल्ह्यात आणि शहरात अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यामध्ये अर्थकारण आणि आरोग्याची काळजी यातील सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. उद्योगांचे चक्र, जनसामान्यांची दैनंदिनी आणि राजकीय दबावाचा सारासार विचार करून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्णय घेतल्याचे दिसते.

महापालिका आणि आरोग्य यंत्रणा संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या बाजूने असले तरी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी उद्योग संघटना सीआयआय, मसिआ, सीएमआयए, व्यापारी महासंघ यांच्याशी रविवारी दिवसभर चर्चा करून सायंकाळी सर्वंकष निर्णय घेतला. उद्योजकांनी रविवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उपाययोजना आणि अर्थकारण याबाबतची वस्तुस्थिती मांडली.

उद्योगचक्र सुरळीत चालावे, हातावर पोट असणाऱ्यांचे नुकसान होऊ नये. या अनुषंगाने सर्व संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. त्यामुळे एका दबाव सर्व प्रशासकीय यंत्रणांवर होता. पगारदार यंत्रणेचे नुकसान होणार नाही, परंतु रोजंदारी मजुरांचे मोठे नुकसान होण्याची भीती अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्यानंतर त्यांनी रविवारी दुपारनंतर मनपा, आरोग्य, पोलीस प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतला.सोमवारपासून लॉकडाऊन जाहीर होणार असल्याच्या अफवेमुळे शहर आणि जिल्ह्यात संदिग्ध वातावरण निर्माण झाले होते. त्यातच खा. इम्तियाज जलील, आ. अतुल सावे आणि मनसेचे उपाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी १०० टक्के लॉकडाऊनला विरोध केला होता. लॉकडाऊन हा संसर्ग रोखण्यासाठी पर्याय असू शकत नाही. सामान्यांचे हाल होतील, अशी भूमिका घेत या पक्षांनी विरोधाचे हत्यार उपसले होते.

उद्योग वर्तुळातून निणर्यामुळे समाधानसीआयआयचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, प्रशासकीय यंत्रणांनी घेतलेला हा निर्णय संतुलन साधणारा निर्णय आहे. मुव्हमेंटवर बंधने असावीत आणि अर्थकारणही चालावे हे महत्त्वाचे आहे. उद्योगांचे १०० टक्के उत्पादन निर्यात आणि आयातीवर अवलंबून होते. लॉकडाऊन- सारख्या निर्णयामुळे उद्योगांसह सामान्यांपर्यंत परिणाम झाले असते. लॉकडाऊनचा निर्णय उत्पादकांसाठी आव्हानात्मक राहिला असता. रविवारी उद्योजकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आले. उद्योजक कोरोना टेस्ट वाढविणार आहेत. शहरातही टेस्ट वाढविल्या पाहिजेत. व्याधिग्रस्तांना लसीकरण देऊ केली आहे, त्या धर्तीवर ४५ वर्षांपुढील उद्योगांतील कामगार यांनाही लस देण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत. प्रत्येक कंपनीत शिबीर घेऊन जास्तीत लसीकरण करावे, अशी सूचना कुलकर्णी यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद