शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

आता नववीच्या अभ्यासक्रमावर २0 गुणांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:31 IST

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता दहावीपासूनच तयार झाली पाहिजे, या उद्देशाने यंदापासून दहावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केले असून, पूर्वज्ञानावर (इयत्ता ९ वी) आधारित २० टक्के गुणांच्या प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता दहावीपासूनच तयार झाली पाहिजे, या उद्देशाने यंदापासून दहावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केले असून, पूर्वज्ञानावर (इयत्ता ९ वी) आधारित २० टक्के गुणांच्या प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.‘लोकमत’शी बोलताना डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, या वर्षापासून केवळ दहावीच्याच अभ्यासक्रमावर आधारित दहावीची परीक्षा असणार नाही. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी २० टक्के गुणांचे प्रश्न हे पूर्वज्ञानावर आधारित असतील. पूर्वज्ञानावर आधारित प्रश्नांचे स्वरूप नेमके काय असेल, पूर्वज्ञानावर नेमके कोणत्या इयत्तेचे प्रश्न असतील, कोणत्या धड्यावर ते प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांबाबत शाळा, मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही संदिग्धता आहे. ही संदिग्धता दूर करण्यासाठी, तसेच बदललेल्या परीक्षा पद्धतीमध्ये जिल्ह्याचा निकाल टिकवून ठेवणे व निकाल उंचावण्यासाठी ‘मिशन एसएससी २०१९’ हा उपक्रम जिल्ह्यात सुरू केला आहे. यासाठी निवडक तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रश्नपेढी (क्वेश्चन बँक) तयार केली आहे.झालेल्या चुका, दिलेले गुण, सर्वच प्रक्रिया दिसेल अ‍ॅपवरयंदा दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेल्या परीक्षा पद्धतीचा विचार करता इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता स्थिती समजून घेण्यासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हे ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून घ्यावे. त्या अ‍ॅपच्या माध्यमातून दुस-या व चौथ्या शनिवारी ‘ईझी टेस्ट’ द्यायची आहे. मुलांनी घरी बसल्या बसल्या ही चाचणी मोबाईलवर दिल्यानंतर लगेच निकालही पाहायला मिळेल. आपणास किती गुण मिळाले, आपले किती प्रश्न चुकले, चुकलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होते, हे सविस्तर अ‍ॅपवर दिसेल.ही चाचणी ऐच्छिक राहणार असली, तरी विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता तपासण्यासाठी उपयोगी राहील. यासाठी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्या, सोमवारी सूचना दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा