शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आता नववीच्या अभ्यासक्रमावर २0 गुणांचे प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:31 IST

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता दहावीपासूनच तयार झाली पाहिजे, या उद्देशाने यंदापासून दहावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केले असून, पूर्वज्ञानावर (इयत्ता ९ वी) आधारित २० टक्के गुणांच्या प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता दहावीपासूनच तयार झाली पाहिजे, या उद्देशाने यंदापासून दहावीच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या परीक्षेत अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केले असून, पूर्वज्ञानावर (इयत्ता ९ वी) आधारित २० टक्के गुणांच्या प्रश्नांचा समावेश केला जाणार आहे, असे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.‘लोकमत’शी बोलताना डॉ. चव्हाण यांनी सांगितले की, या वर्षापासून केवळ दहावीच्याच अभ्यासक्रमावर आधारित दहावीची परीक्षा असणार नाही. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी २० टक्के गुणांचे प्रश्न हे पूर्वज्ञानावर आधारित असतील. पूर्वज्ञानावर आधारित प्रश्नांचे स्वरूप नेमके काय असेल, पूर्वज्ञानावर नेमके कोणत्या इयत्तेचे प्रश्न असतील, कोणत्या धड्यावर ते प्रश्न असतील, अशा अनेक प्रश्नांबाबत शाळा, मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्येही संदिग्धता आहे. ही संदिग्धता दूर करण्यासाठी, तसेच बदललेल्या परीक्षा पद्धतीमध्ये जिल्ह्याचा निकाल टिकवून ठेवणे व निकाल उंचावण्यासाठी ‘मिशन एसएससी २०१९’ हा उपक्रम जिल्ह्यात सुरू केला आहे. यासाठी निवडक तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने प्रश्नपेढी (क्वेश्चन बँक) तयार केली आहे.झालेल्या चुका, दिलेले गुण, सर्वच प्रक्रिया दिसेल अ‍ॅपवरयंदा दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेल्या परीक्षा पद्धतीचा विचार करता इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता स्थिती समजून घेण्यासाठी ‘मोबाईल अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी हे ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून घ्यावे. त्या अ‍ॅपच्या माध्यमातून दुस-या व चौथ्या शनिवारी ‘ईझी टेस्ट’ द्यायची आहे. मुलांनी घरी बसल्या बसल्या ही चाचणी मोबाईलवर दिल्यानंतर लगेच निकालही पाहायला मिळेल. आपणास किती गुण मिळाले, आपले किती प्रश्न चुकले, चुकलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होते, हे सविस्तर अ‍ॅपवर दिसेल.ही चाचणी ऐच्छिक राहणार असली, तरी विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता तपासण्यासाठी उपयोगी राहील. यासाठी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्या, सोमवारी सूचना दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षा