शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आता मका, सुपारीच्या पानांच्या पत्रावळ्या बाजारात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 19:22 IST

औरंगाबाद : सिल्व्हर कोटेड पत्रावळी, प्लास्टिकच्या ग्लासवर बंदी आल्याने आता विक्रेत्यांनी पर्याय शोधणे सुरूकेले आहे. येत्या १५ दिवसांत मक्याच्या ...

औरंगाबाद : सिल्व्हर कोटेड पत्रावळी, प्लास्टिकच्या ग्लासवर बंदी आल्याने आता विक्रेत्यांनी पर्याय शोधणे सुरूकेले आहे. येत्या १५ दिवसांत मक्याच्या पानापासून बनलेल्या पत्रावळी बाजारात आणण्यात येणार आहेत. मात्र, या पत्रावळी महाग असल्याने त्या किती प्रमाणात स्वीकारल्या जातील, याबाबत शंका आहे.    

श्रावण महिन्याला १२ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर सणासुदीला सुरुवात होत आहे. उपवास, भंडारा असे विविध धार्मिक कार्यक्रम चातुर्मासात असणार आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण त्यानंतर आहेत. यानिमित्ताने पत्रावळी व ग्लासला मोठी मागणी राहणार आहे. पूर्वी बदामाच्या पानाच्या पत्रावळी विकल्या जात नंतर त्या पत्रावळी शिलाई करून येऊ लागल्या होत्या; पण नंतर त्याची जागा सिल्व्हर कोटेड व थर्माकोलच्या प्लेटने घेतली. 

आता, प्लास्टिक व थर्माकोलवर राज्य सरकारने बंदी आणली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आता नवीन पर्यायी शोधणे सुरू केले आहे. सिल्व्हर कोटेड पत्रावळीऐवजी आता मक्याच्या पानाची पत्रावळी तसेच सुपारीच्या पानाची पत्रावळी बाजारात दाखल होत आहे. ६ ते ९ रुपये प्रतिनग, अशी या पत्रावळीची किंमत आहे. यासाठी स्वस्त असणाऱ्या बदामाच्या पानाच्या पत्रावळी मागविण्यावर व्यापाऱ्यांचा भर दिसून येतो. मात्र, संपूर्ण राज्यातून या पत्रावळीला मागणी वाढल्याने ओडिसात बदामाच्या पत्रावळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कागदाच्या ग्लासला चांगली मागणी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

केळीच्या पानालाही येणार भाव शहरात खान्देशातून केळीची पाने विक्रीसाठी येत असतात. घरगुती धार्मिक कार्यात आवर्जून केळीची पाने मागविली जातात. श्रावणात मोठ्या प्रमाणात केळीची पाने शहरात येत असतात. यावेळी केळीची पानेही महाग होतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. 

रद्दीचे भाव वाढले कॅरिबॅगवर बंदी आहे. हँडल नसलेल्या किराणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बॅगवर बंदी आहे की नाही, याविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. ५० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या प्लास्टिक बॅगवरही कारवाई करणार का, याविषयी मनपाकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यामुळे कारवाईच्या भीतीने अनेक किराणा दुकानदारांनी आज पेपरच्या पुड्यात किराणा सामान बांधून देणे सुरू केले होते. त्यामुळे रद्दीला मागणी वाढली. १० किलोची रद्दी २५० रुपयांना विकली जात होती. २५ रुपये किलोपर्यंत रद्दीचा भाव गेला होता. काही व्यापाऱ्यांनी तर शहराबाहेरील रद्दीवाल्यांकडे फोन लावून रद्दी काढून ठेवण्यासाठी आॅर्डर दिली. मात्र, एका रद्दी विक्रेत्याने सांगितले की, आम्ही १० रुपये किलोने रद्दी खरेदी करीत आहोत. १५ ते १६ रुपये किलोने विकत आहोत. काही जणांनी संधीचा फायदा घेऊन २० ते २५ रुपये किलोपर्यंतही रद्दी विकली. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabadऔरंगाबादMarketबाजार