शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

आता सकाळी आणि सायंकाळी ‘नो’ पावती

By admin | Updated: July 30, 2016 01:00 IST

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर वाहतूक कोंडी होत असते. तांत्रिक कारणांमुळे सिग्नल खराब झाल्यास वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते.

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर वाहतूक कोंडी होत असते. तांत्रिक कारणांमुळे सिग्नल खराब झाल्यास वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते. अशा वेळी जर वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पावत्या देत बसले तर वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. ही बाब लक्षात घेऊन यापुढे सकाळी आणि सायंकाळी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंडाच्या पावत्या देऊ नका, त्यांच्या वाहनांचे नंबर केवळ लिहून ठेवा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले. जालना रोडसह शहरातील विविध चौक आणि अन्य रस्त्यांवर कोठे ना कोठे वाहतुकीची कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात शहर, छावणी, वाळूज आणि सिडको वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, जालना रोडवरील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीला चौकाचौकांतील सदोष वाहतूक सिग्नलही जबाबदार आहेत. सिग्नलचे टायमिंग चुकलेले आहेत. ही बाब महानगरपालिक ा आयुक्त बकोरिया यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. शिवाय वाहतूक पोलीस हे नियम तोडून पळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात व्यस्त असतात. विशेषत: सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ पर्यंत जालना रोडवरील वाहनांची संख्या अधिक असते. अशा वेळी वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतूक नियमन करण्याकडेच लक्ष द्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत नियम तोडून पळणाऱ्या वाहनाचा नंबर लिहून ठेवावा, अथवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आल्याचे आयुकत म्हणाले.जालना रोडवरील ११ चौकांत प्रत्येकी ८ पोलीसजालना रोडवरील नगरनाका ते मुकुंदवाडीदरम्यान ११ वाहतूक चौक आहेत. या चौकातील प्रत्येक सिग्नलवर आता प्रत्येकी ६ ते ८ वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत. तांत्रिक कारणांमुळे सिग्नल खराब झाला अथवा त्याचे टायमिंग चुकल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ स्वत: हाताने वाहतूक नियमन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. सामंजस्याने वागा...चार दिवसांमध्ये पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या लोकांविरोधात आम्ही कठोर कारवाई केली. शिवाय यापुढे हेल्मेटसक्ती, ट्रीपल सीट अथवा विचित्र नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी वाहन चालकांसोबत समजूतदारपणाने वागावे, अशा सूचना देण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. शिवाय पोलिसांसोबत अरेरावी करणाऱ्यांविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असून, हेल्मेटसक्तीची मोहीम सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.