शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

हवेतील प्रदूषणावर आता राहणार नजर

By admin | Updated: June 3, 2016 23:44 IST

औरंगाबाद : शहराची हवा कितपत शुद्ध आहे, हवेत कोणकोणते घातक घटक पसरले आहेत,

औरंगाबाद : शहराची हवा कितपत शुद्ध आहे, हवेत कोणकोणते घातक घटक पसरले आहेत, औद्योगिक वसाहतींमधील कोणती कंपनी वातावरण प्रदूषित करीत आहे, यावर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची 24/7 नजर राहणार आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये त्यासाठी ८० लाख रुपये खर्च करून हवेची गुणवत्ता मोजणी करणारे केंद्र उभारण्यात आले आहे.वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या जागेत हे केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे मराठवाड्यातील हे पहिलेच केंद्र आहे. मुंबईतील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि दिल्लीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी हे केंद्र थेट जोडण्यात आले आहे. अशा प्रकारे औरंगाबादेतील प्रदूषणावर थेट दिल्ली व मुंबईचा ‘वॉच’ राहणार आहे. २० कि. मी. कार्यक्षेत्रवाऱ्याच्या वेगावर केंद्राचे कार्य अवलंबून आहे. वाऱ्याचा वेग जेवढा जास्त, तेवढ्या अधिक परिसराला या केंद्राचा फायदा होतो. शहरात साधारणत: १२ ते १५ कि. मी. प्रतितास एवढ्या वेगाने वारे वाहत असतात. वाऱ्याचा वेग ताशी २० कि. मी. एवढा असल्यास २० कि. मी. परिघातील प्रदूषण मोजता येते. असा होईल फायदावातावरणात प्रदूषण पसरविणारे रासायनिक उद्योग कोणते आहेत, याचा उलगडा या केंद्रामुळे होणार आहे. या केंद्रावरील नोंदीमुळेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी तीन कंपन्यांवर कारवाई केली होती.धूलिकणांचे प्रमाण जास्तऔरंगाबादच्या हवेत धूलिकण वगळता इतर घातक घटक नसल्याचे या केंद्रावरील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. केंद्रामध्ये होणाऱ्या नोंदीचा अभ्यास करून प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.- डी. बी. पाटील, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळया छोटेखानी केंद्राच्या छतावर हवेतील प्रदूषण मोजणारी विविध यंत्रे बसविण्यात आली आहेत. केंद्रातील नऊ अत्याधुनिक मॉनिटरला ती जोडली आहेत. हवेतील घटकाची नोंद या मॉनिटरवर सतत होत असते. नायट्रिक आॅक्साईड, सल्फरडाय आॅक्साईड, धूलिकण, भूगर्भावरील ओझोन थर, कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड, अमोनिया, बेनझीन यांचे हवेतील प्रमाण केंद्रात नोंदविले जाते. एवढेच नव्हे, तर बाहेर बसविण्यात आलेल्या ‘स्क्रीन’वर ही आकडेवारी प्रदर्शित केली जाते. याशिवाय वाऱ्याचा वेग व दिशा, सूर्याचे उत्सर्जन, तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान यांच्या नोंदी घेण्याची सुविधादेखील उपलब्ध आहे, असे केंद्र संचालक प्रवीण सिंह यांनी सांगितले.