शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अंगणवाडी कर्मचाºयांचे आता जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:52 IST

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती बिकट झाली आहे़ जिल्ह्यातील बहुतांश उघड्यावर भरणाºया अंगणवाड्यांमध्ये शिकविण्यासाठी अंगणवाडीताई नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़जिल्ह्यात ठिकठिकाणी ६०० अंगणवाड्यांसाठी ६ लाख रूपये खर्चून स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येणार असले तरी बांधकामांना सुरूवात झाली नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाजमंदिर, खाजगी इमारतीत भरविल्या जातात़ त्यातच अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे नवीन प्रश्नाची भर पडली आहे़पायाभूत शिक्षण दर्जेदार देण्यासाठी अंगणवाड्यांचे स्वरूप बदलण्याच्या घोषणा होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ आजही वस्ती, वाडे, तांडे, ग्रामीण भागात गोरगरिबांची मुले उघड्यावर अक्षरे गिरवताना दिसत आहेत़काही गावांत समाजमंदिर, मंदिरात या अंगणवाड्या भरविण्यात येत आहेत़ तसेच काही ठिकाणी खाजगी इमारत भाड्याने घेवून अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत, परंतु या खाजगी इमारतीचे भाडे अनेक महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची स्थिती नाजूक झाली आहे़ दरम्यान, संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ वेळेवर पुरक आहार मिळत नसल्याने राज्यातील बालके दगावत आहेत़ यासंदर्भात कृती समितीचे जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, संपाचा पुढील टप्पा म्हणून परभणी येथे गुरूवारी जेलभरो अांदोलन करण्यात येत आहे़ याच दिवशी मुंबईत मुख्यमंत्री आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत़ त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे़ अन्यथा आंदोलन यापुढेही सुरुच ठेवण्यात येईल़अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी पर्यायी आहार देण्याची मागणी केली आहे़ महाराष्ट्र राज्यात विशेषत: आदिवासी विभागात बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टीएचआर दिला जातो. तो अत्यंत निकृष्ट असतो.