शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
4
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
5
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
6
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
7
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
8
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
9
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
10
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
11
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
12
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
13
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
15
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
16
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
17
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
18
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
19
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
20
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!

अंगणवाडी कर्मचाºयांचे आता जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:52 IST

अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आता जेलभरो आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली़अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांची स्थिती बिकट झाली आहे़ जिल्ह्यातील बहुतांश उघड्यावर भरणाºया अंगणवाड्यांमध्ये शिकविण्यासाठी अंगणवाडीताई नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़जिल्ह्यात ठिकठिकाणी ६०० अंगणवाड्यांसाठी ६ लाख रूपये खर्चून स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येणार असले तरी बांधकामांना सुरूवात झाली नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाड्या उघड्यावर, देवालय, समाजमंदिर, खाजगी इमारतीत भरविल्या जातात़ त्यातच अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे नवीन प्रश्नाची भर पडली आहे़पायाभूत शिक्षण दर्जेदार देण्यासाठी अंगणवाड्यांचे स्वरूप बदलण्याच्या घोषणा होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही़ आजही वस्ती, वाडे, तांडे, ग्रामीण भागात गोरगरिबांची मुले उघड्यावर अक्षरे गिरवताना दिसत आहेत़काही गावांत समाजमंदिर, मंदिरात या अंगणवाड्या भरविण्यात येत आहेत़ तसेच काही ठिकाणी खाजगी इमारत भाड्याने घेवून अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत, परंतु या खाजगी इमारतीचे भाडे अनेक महिन्यांपासून रखडले आहे़ त्यामुळे अंगणवाड्यांची स्थिती नाजूक झाली आहे़ दरम्यान, संपामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ वेळेवर पुरक आहार मिळत नसल्याने राज्यातील बालके दगावत आहेत़ यासंदर्भात कृती समितीचे जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, संपाचा पुढील टप्पा म्हणून परभणी येथे गुरूवारी जेलभरो अांदोलन करण्यात येत आहे़ याच दिवशी मुंबईत मुख्यमंत्री आमच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार आहेत़ त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे़ अन्यथा आंदोलन यापुढेही सुरुच ठेवण्यात येईल़अंगणवाडीतील बालकांना पुरविण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी पर्यायी आहार देण्याची मागणी केली आहे़ महाराष्ट्र राज्यात विशेषत: आदिवासी विभागात बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टीएचआर दिला जातो. तो अत्यंत निकृष्ट असतो.