शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आता सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाबाधितांचे घरीच विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 13:22 IST

सौम्य लक्षणे असणाऱ्या बाधितांना होम क्वारंटाईन करण्यावर प्रशासकीय यंत्रणेचे एकमत

ठळक मुद्देसुविधा असणाऱ्या रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्धप्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत

औरंगाबाद : नागपूर, अमरावती, पुणे जिल्ह्याच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्यातही ज्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी घरे किंवा स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण (होम क्वारंटाईन) होता येणार आहे. पुढील सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असल्याची  माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी दिली. होम क्वारंटाईन करण्याबाबत आजवर प्रशासनात समन्वयाचा अभाव होता. होम क्वारंटाईनचा निर्णय लवकर न घेतल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. 

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, आ. अतुल सावे, आ. प्रदीप जैस्वाल, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, ज्या घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे  असतील त्यांची स्वतंत्र मोठी घरे आहेत, तसेच ग्रामीण भागातही ज्यांच्या शेतात स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा सर्व कोरोनाबाधित रुग्णांना घरीच विलगीकरण होण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामुळे प्रशासनावरील वाढलेला ताण कमी होण्यास मदत होईलच, शिवाय रुग्णांना सोयीचे होणार आहे. 

लोकप्रतिनिधींच्या सूचना अशा - खा. कराड म्हणाले, कोविड केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या दररोज भेटी देण्यावर भर द्यावा. - खा. जलील म्हणाले, घाटी रुग्णालयामध्ये मनुष्यबळाचा अभाव दिसून येत असून, तात्काळ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी. - आ. बागडे यांनी कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात जाण्यास त्रास होत असून, आंबेडकर चौक ते पिसादेवी हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली. - आ. दानवे म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.  - आ. सावे म्हणाले, वाळूज येथील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधील कामगारांची अँटिजन टेस्टची संख्या वाढविण्यात यावी. - आ. जैस्वाल यांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची व हर्सूल तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद