शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आता आरोग्य केंद्रे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ म्हणून ओळखणार, पण सेवा-सुविधांचे काय?

By विजय सरवदे | Updated: November 30, 2023 16:22 IST

नावे बदलली जातील. पण, या केंद्रांतील आरोग्य सेवा- सुविधांचे काय, असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना आरोग्याच्या सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २७९ उपकेंद्रांचे लवकरच नामांतर होणार असून, ही केंद्रे यापुढे ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ या नावाने ओळखली जातील. तथापि, नावे बदलली जातील. पण, या केंद्रांतील आरोग्य सेवा- सुविधांचे काय, असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची नावे बदलून ती आरोग्य वर्धिनी केंद्र म्हणून ओळखली जात होती. मात्र, त्यानंतरही या आरोग्य केंद्रांना भौतिक सुविधा मिळाल्या नव्हत्या. या केंद्रांमध्ये जवळपास ३०० आरोग्य सेविकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे संस्थात्म प्रसूती, नियमित लसीकरण, कुटुंब कल्याणसाठी महिलांना प्रवृत्त करणे, गृहभेटी, आदी उपक्रम रखडले आहेत. या केंद्रांसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येते. या बाबींकडेही शासनाने लक्ष दिले पाहिजे, असे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाला आरोग्य केंद्रांची नावे बदलण्याचे पत्र २५ नोव्हेंबरला प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ अशा नामकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अल्प आहे. एकीकडे माता व बालमृत्यू टाळण्यासाठी रुग्णालयात प्रसूती व्हावी, असा शासनाचा आग्रह आहे. मात्र, ग्रामीण भागात हे प्रमाण १० टक्क्यांच्या पुढे सरकत नाही. यासाठी प्रशिक्षित आरोग्यसेविका व डॉक्टरांची गरज आहे. आरोग्य केंद्रांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११३ पदे मंजूर आहेत. पण, अवघे ८९ वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. अलीकडे जिल्हास्तर भरतीचे अधिकार मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने २४ डॉक्टरांची भरती केली. अजूनही काही आरोग्य केंद्रांना डॉक्टर नाहीत.

नागरिकांची सकारात्मक मानसिकता व्हावीप्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त आजारी लोकच सुश्रूषासाठी जात असतात. सुदृढ नागरिकांच्या मनात दवाखान्याविषयी असलेली नकारात्मक मानसिकता बदलण्यासाठी आरोग्य केंद्राऐवजी ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ असे नाव राहिल्यास चांगली धस्टपूस्ट लोकही आरोग्याची तपासणी करण्यासाठी तिथे जातील, हा यामागचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल