शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आता श्रीमंत असो की गरीब, सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचार

By विजय सरवदे | Updated: December 1, 2023 17:22 IST

जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शंभर टक्के नागरिकांना आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड अनिवार्य आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बीपीएलसह केशरी शिधापत्रिकाधारक अशा एकूण २३ लाख नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. परंतु, रेशन कार्ड आणि आधार कार्डवरील नावे जुळत नसल्यामुळे आशा वर्कर्संसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. या दाखल्याच्या आधारे स्वत: ऑनलाइन अथवा आपले सरकार सेवा केंद्रातून हे कार्ड काढता येते.

यासंदर्भात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, जिल्हा आरोग्य विभागाने सध्या प्राधान्यक्रमाने जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसह केशरी शिधापत्रिकाधारकांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. शासनाने पूर्वी अशा ४ लाख ६० हजार कार्डधारकांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर १० लाखांचे उद्दिष्ट झाले. आता २३ लाख कार्डधारकांचे गोल्डन कार्ड काढण्याचे निर्देश आहेत. मात्र, अनेक कार्डधारकांची नावे पोर्टलवर अपलोड झालेली नाहीत. अनेकांची नावे रेशन कार्ड व आधार कार्डाप्रमाणे जुळत नाहीत (मिस मॅच). त्यामुळे आशा वर्कर्ससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाकडून यावर तोडगा काढला जात आहे. सध्या जिल्ह्यात २० टक्के अर्थात ४ लाख १० हजार नागरिकांचे कार्ड काढण्यात आलेले आहे.

जानेवारी अखेरपर्यंत मोहीम फत्तेमहात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नागरिकांना सरकारी व खासगी दवाखान्यात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. आता आशा वर्कर्सचा संप मिटला असून १८३३ जणी कार्ड काढण्याच्या कामाला जुंपल्या आहेत. कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्पही लावले जाणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत कार्ड काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल