शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वडिलोपार्जित जमीन वाटपाचे अधिकार आता तहसीलदारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:03 IST

शासनाने आता जमीन वाटपाचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. सातबारा उताºयावर वारसदारांची नावे लावण्यासाठी अथवा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी दुय्यम निबंधक कार्यालय अथवा कोर्टाच्या पायºया झिजविण्याची आता गरज नाही.

श्यामकुमार पुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : शासनाने आता जमीन वाटपाचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत. सातबारा उताºयावर वारसदारांची नावे लावण्यासाठी अथवा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी दुय्यम निबंधक कार्यालय अथवा कोर्टाच्या पायºया झिजविण्याची आता गरज नाही. कोणतेही शुल्क न भरता सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. याबाबतचा आदेश शासनाने काढल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शेतकºयांनी धारण केलेल्या शेतजमिनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीतील हिश्याच्या विभाजनासाठी तहसीलदारांकडे अर्ज करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कायद्यानुसार सहधारक असलेल्या जमिनीतील हिश्याच्या वाटपाची कार्यवाही करण्यात येत आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीच्या बाहेर जाऊन नोंदणीकृत वाटपपत्र असल्याशिवाय जिल्ह्यात वाटणी व विभाजन करण्यात येत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे तहसीलदारांच्या स्तरावर बरेच हिस्से वाटणीची प्रकरणे प्रलंबित होते. शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या नोंदणीबाबत असलेला संभ्रम दूर करण्याच्या व संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रीय कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याच्या उद्देशाने क्षेत्रीय अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.कुटुंबातील जमिनीचे वाटप करण्यासाठी अथवा मयताच्या वारसदारांची नावे सातबारा उताºयावर लावण्याची एक सोपी पद्धत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून सातबारा उताºयावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६च्या कलम ८५ नुसार तहसीलदारांकडे अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याबाबतच्या परिपत्रकाची कायदेशीर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांवर राहणार आहे.