शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

आता शेतक-यांसाठी किसान शिखर मंच करणार आंदोलन

By admin | Updated: June 16, 2017 22:11 IST

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या विचारात शेतक-यांच्या प्रश्नांवर मागील ३० वर्षांत आंदोलन केलेल्या शेतकरी संघटनेच्या

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 -  शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या विचारात शेतक-यांच्या प्रश्नांवर मागील ३० वर्षांत आंदोलन केलेल्या शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक सुभेदारी विश्रामगृहात शुक्रवारी पार झाली. या बैठकीत शेतक-यांचा लढा अधिक प्रखर करण्यासाठी सर्वानुमते किसान शिखर मंचाची स्थापना करण्यात आली आहे.राज्यात शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी शेतकरी नेत्यांची बैठक माजी आमदार शंकर धोंडगे यांनी बोलावली होती. या बैठकीत अनेकांनी नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाबाबत सुकाणू समिती आणि सरकार यांच्यातील सरसकट कर्जमाफी व इतर मागण्याबाबत झालेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. सरकारकडून शेतक-यांची फसवणूक होत असल्याची भावनाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी काळात शेतक-यांचा लढा अधिक परिणामकारक करण्यासाठी विभागवार मेळावे आणि मुख्यमंत्र्यांशी भेटून सविस्तर निवेदन देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. संपूर्ण कर्जमाफीची घोषणा फसवी असून, प्रत्यक्षात लाभ मिळण्यास उशीर लागणार असल्याचेही अनेकांनी सांगितले. यामुळे आगामी काळात एक नव्या आंदोलनाची घोषणा करून कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांच्या पदरी कर्जमुक्तीसह इतर मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. याविषयी निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीला ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील, माजी विधानसभा उपसभापती मोरेश्वर टेंभुर्डे, माजी आमदार सरोजाताई काशीकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनील धनवट, डॉ. गिरिधर पाटील, माजी अध्यक्ष किशोर माधकर, सुरेखाताई ठाकरे, ललीत बहाळे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, वामनराव जाधव, डॉ. मानवेंद्र काचोळे, गोविंद जोशी, कॉ. अण्णासाहेब कदम, गजानन अहमदाबादकर, बद्रीनाथ देवकर, समाधान कृपाळे, पुंडलिकराव उकिर्डे, दत्ता पवार, संतोष देशमुख, अ‍ॅड. प्रकाश पाटील, संजय कोल्हे, संजय सोळंके, बाबूराव गोल्डे, सीमा नरवडे, जयश्री पाटील, हसन देशमुख, लक्ष्मणराव वगे, गणपतराव हंगरगेकर, मनोज तायडे आदी उपस्थित होते.