शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आता समितीच्या कारवाईचा धसका

By admin | Updated: July 8, 2017 23:41 IST

हिंगोली : अंदाज समितीने जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील विविध भागांत विकासकामांची पाहणी केली. त्यात काही ठिकाणच्या कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अंदाज समितीने जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील विविध भागांत विकासकामांची पाहणी केली. त्यात काही ठिकाणच्या कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचा पंचनामा केल्यानंतर स्थानिक विभागप्रमुखांना कारवाई करण्याच्या अथवा शिफारशीच्या सूचना दिल्या. मात्र त्यात काहींचे ‘फिल गुड’ झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. अंदाज समितीने हिंगोली जिल्ह्यात विविध कामांची पाहणी केली. अनेक आर्थिक अनियमिततेच्या तक्रारी या समितीकडे गेल्या होत्या. काहींनी तर समितीच्या सदस्यांचे आगमन झाल्यानंतर येथे तक्रारींचा पाढा वाचणे सुरू केले होते. याची दखल घेत काही ठिकाणच्या कामांना या समितीने भेट दिली. कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयातही डॉक्टर राहत नसल्याच्या गेल्या अनेक दिवसांच्या असलेल्या तक्रारींना समितीच्या आगमनामुळे खऱ्या अर्थाने वाचा फुटली. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर हे भोकर येथून याच कारणांनी बदलीवर कळमनुरी येथे आले होते. कामावर हजर न राहणे, आर्थिक अनियमितता, कर्मचाऱ्यांचे वेतन न करणे या गंभीर बाबींचा ठपका ठेवल्यानंतरही लोणीकर यांना अधीक्षक म्हणूनच का पाठविले? हा गंभीर प्रश्न आहे. समितीने याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. रॉकेल आता सामान्यांना कुठे मिळतच नाही. नियतनही दिवसेंदिवस घटत चालले आहे. रॉकेल जाते कुठे हे सगळ्यांनाच माहिती आहे. शिवाय रॉकेलचे शासकीय दरही वाढू लागले आहेत. त्यातही वितरकच कमी रॉकेल देत असतील तर ग्रामीण विक्रेते त्यापासून योग्य तो बोध घेणारच, यात शंका नाही.रस्त्यांची कामे पूर्वीही व्हायची, आताही होतात. मात्र आता नवनवी कारणे सांगून रस्त्याचे काम दर्जेदार केले होते. मात्र आता त्यात असे झाले, हे सांगणे सोपे झाले आहे. अभियंता मंडळी उंटावरून शेळ्या हाकते. तुकडे पाडून कामे करण्याच्या प्रकारात एमबी लिहिण्यापेक्षा त्यावर केवळ स्वाक्षऱ्या करण्यातच अभियंत्यांचे हात दुखतात, मग कामाची तपासणी कधी करायची? दर्जा कोणी तपासायचा? हे यक्षप्रश्न सुटत नाहीत. त्यातच खालपासून वरपर्यंतची साखळी एकमेकांना सांभाळायला तयारच आहे. ही बोंब बंधाऱ्यांच्याही कामाची. या दौऱ्यात समितीने अधिकाऱ्यांना जोरात जाब विचारले तरीही काही ठिकाणी नरमाईची भूमिका घेतली. ज्यांना समितीचा ‘अंदाज’ आला होता, त्यांनी मात्र आपले इप्सित साधून घेतले. यात काहींना ‘रोकडा’ फटका बसल्याचेही आता चर्चेत येत आहे. काहींनी तर यासाठी भागीदारही शोधल्याचे चर्चिले जात आहे. मात्र समितीने खरोखर काय कारवाई केली, हे लवकरच समोर येणार आहे.