शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

आता समितीच्या कारवाईचा धसका

By admin | Updated: July 8, 2017 23:41 IST

हिंगोली : अंदाज समितीने जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील विविध भागांत विकासकामांची पाहणी केली. त्यात काही ठिकाणच्या कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अंदाज समितीने जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील विविध भागांत विकासकामांची पाहणी केली. त्यात काही ठिकाणच्या कामांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचा पंचनामा केल्यानंतर स्थानिक विभागप्रमुखांना कारवाई करण्याच्या अथवा शिफारशीच्या सूचना दिल्या. मात्र त्यात काहींचे ‘फिल गुड’ झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. अंदाज समितीने हिंगोली जिल्ह्यात विविध कामांची पाहणी केली. अनेक आर्थिक अनियमिततेच्या तक्रारी या समितीकडे गेल्या होत्या. काहींनी तर समितीच्या सदस्यांचे आगमन झाल्यानंतर येथे तक्रारींचा पाढा वाचणे सुरू केले होते. याची दखल घेत काही ठिकाणच्या कामांना या समितीने भेट दिली. कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयातही डॉक्टर राहत नसल्याच्या गेल्या अनेक दिवसांच्या असलेल्या तक्रारींना समितीच्या आगमनामुळे खऱ्या अर्थाने वाचा फुटली. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर हे भोकर येथून याच कारणांनी बदलीवर कळमनुरी येथे आले होते. कामावर हजर न राहणे, आर्थिक अनियमितता, कर्मचाऱ्यांचे वेतन न करणे या गंभीर बाबींचा ठपका ठेवल्यानंतरही लोणीकर यांना अधीक्षक म्हणूनच का पाठविले? हा गंभीर प्रश्न आहे. समितीने याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. रॉकेल आता सामान्यांना कुठे मिळतच नाही. नियतनही दिवसेंदिवस घटत चालले आहे. रॉकेल जाते कुठे हे सगळ्यांनाच माहिती आहे. शिवाय रॉकेलचे शासकीय दरही वाढू लागले आहेत. त्यातही वितरकच कमी रॉकेल देत असतील तर ग्रामीण विक्रेते त्यापासून योग्य तो बोध घेणारच, यात शंका नाही.रस्त्यांची कामे पूर्वीही व्हायची, आताही होतात. मात्र आता नवनवी कारणे सांगून रस्त्याचे काम दर्जेदार केले होते. मात्र आता त्यात असे झाले, हे सांगणे सोपे झाले आहे. अभियंता मंडळी उंटावरून शेळ्या हाकते. तुकडे पाडून कामे करण्याच्या प्रकारात एमबी लिहिण्यापेक्षा त्यावर केवळ स्वाक्षऱ्या करण्यातच अभियंत्यांचे हात दुखतात, मग कामाची तपासणी कधी करायची? दर्जा कोणी तपासायचा? हे यक्षप्रश्न सुटत नाहीत. त्यातच खालपासून वरपर्यंतची साखळी एकमेकांना सांभाळायला तयारच आहे. ही बोंब बंधाऱ्यांच्याही कामाची. या दौऱ्यात समितीने अधिकाऱ्यांना जोरात जाब विचारले तरीही काही ठिकाणी नरमाईची भूमिका घेतली. ज्यांना समितीचा ‘अंदाज’ आला होता, त्यांनी मात्र आपले इप्सित साधून घेतले. यात काहींना ‘रोकडा’ फटका बसल्याचेही आता चर्चेत येत आहे. काहींनी तर यासाठी भागीदारही शोधल्याचे चर्चिले जात आहे. मात्र समितीने खरोखर काय कारवाई केली, हे लवकरच समोर येणार आहे.