शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर घरे बांधणाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: April 30, 2015 00:37 IST

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़ या रस्त्यावर बांधण्यात आलेले घर अथवा कच्चे अतिक्रमण १५ दिवसात काढण्यात यावेत, अशा नोटिसा १० अतिक्रमण धारकांना मनपा आयुक्तांनी पाठविल्या आहेत़ नोटिसा पाठविलेल्या व्यक्ती शहरातील बड्या हस्ती आहेत. यामुळे खळबळ उडाली असून, सिग्नल कॅम्पला हादरा बसला आहे.लातूर इंडस्ट्रीयल स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमण करुन काही लोकांनी रस्ता बंद केला आहे़ या रस्त्यावर काहींनी पक्के घरे बांधली आहेत़ काही लोकांनी शिकवणी वर्गाला ही जागा बांधकाम करुन भाड्याने दिली आहे़ गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेच्या या रस्त्यावर त्यांचे अतिक्रमण आहे़ यासंदर्भात २२ आॅक्टोबर २०१३ रोजी मनपा आयुक्तांकडे मल्लिकार्जून भाईकट्टी यांनी तक्रार केली़ या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत अतिक्रमण केलेल्या १० लोकांना २७ एप्रिल २०१५ रोजी नोटिसा पाठविल्या आहेत़ मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर पक्के /कच्चे बांधकाम त्वरीत काढावे़ अथवा १५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल. स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल़ त्यावर झालेला खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असेही या नोटीसीत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)केनिया मुकुंदराव कवरजी (आर८/४७), केनिया मुकुंदराव कवरजी (आर ८/४६), केनिया कस्तुर बेन (आर ८/४८), सुंदर बेन शांतीलाल शहा (आर ८/४९), प्रेमादेवी रमेशचंद्र भुतडा (आर ८/६९), रामेश्वर रामकिशन भराडिया (आर ८/७१), रमेशचंद्र नारायणदास भुतडा (आर ८/७०), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७३), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७२), स्रेहा असोसियशन (आर ८/७४), इंडस्ट्रील स्टेट सिग्नल कॅम्प, लातूर या दहा जणांना मनपाने नोटिसा बजावल्या आहेत़ इंडस्ट्रील स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी काही ठिकाणी पक्के तर काही ठिकाणी कच्चे बांधकाम केले आहे़ या अतिक्रमण धारकांना तक्रारीनुसार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ तसेच त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे़ त्यांचे म्हणणे असमाधानकारक असेल, तर अतिक्रमण काढण्यात येईल़ परंतु त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़