शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

रस्त्यावर घरे बांधणाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: April 30, 2015 00:37 IST

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़ या रस्त्यावर बांधण्यात आलेले घर अथवा कच्चे अतिक्रमण १५ दिवसात काढण्यात यावेत, अशा नोटिसा १० अतिक्रमण धारकांना मनपा आयुक्तांनी पाठविल्या आहेत़ नोटिसा पाठविलेल्या व्यक्ती शहरातील बड्या हस्ती आहेत. यामुळे खळबळ उडाली असून, सिग्नल कॅम्पला हादरा बसला आहे.लातूर इंडस्ट्रीयल स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमण करुन काही लोकांनी रस्ता बंद केला आहे़ या रस्त्यावर काहींनी पक्के घरे बांधली आहेत़ काही लोकांनी शिकवणी वर्गाला ही जागा बांधकाम करुन भाड्याने दिली आहे़ गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेच्या या रस्त्यावर त्यांचे अतिक्रमण आहे़ यासंदर्भात २२ आॅक्टोबर २०१३ रोजी मनपा आयुक्तांकडे मल्लिकार्जून भाईकट्टी यांनी तक्रार केली़ या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत अतिक्रमण केलेल्या १० लोकांना २७ एप्रिल २०१५ रोजी नोटिसा पाठविल्या आहेत़ मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर पक्के /कच्चे बांधकाम त्वरीत काढावे़ अथवा १५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल. स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल़ त्यावर झालेला खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असेही या नोटीसीत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)केनिया मुकुंदराव कवरजी (आर८/४७), केनिया मुकुंदराव कवरजी (आर ८/४६), केनिया कस्तुर बेन (आर ८/४८), सुंदर बेन शांतीलाल शहा (आर ८/४९), प्रेमादेवी रमेशचंद्र भुतडा (आर ८/६९), रामेश्वर रामकिशन भराडिया (आर ८/७१), रमेशचंद्र नारायणदास भुतडा (आर ८/७०), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७३), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७२), स्रेहा असोसियशन (आर ८/७४), इंडस्ट्रील स्टेट सिग्नल कॅम्प, लातूर या दहा जणांना मनपाने नोटिसा बजावल्या आहेत़ इंडस्ट्रील स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी काही ठिकाणी पक्के तर काही ठिकाणी कच्चे बांधकाम केले आहे़ या अतिक्रमण धारकांना तक्रारीनुसार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ तसेच त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे़ त्यांचे म्हणणे असमाधानकारक असेल, तर अतिक्रमण काढण्यात येईल़ परंतु त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़