शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

रस्त्यावर घरे बांधणाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: April 30, 2015 00:37 IST

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़

लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़ या रस्त्यावर बांधण्यात आलेले घर अथवा कच्चे अतिक्रमण १५ दिवसात काढण्यात यावेत, अशा नोटिसा १० अतिक्रमण धारकांना मनपा आयुक्तांनी पाठविल्या आहेत़ नोटिसा पाठविलेल्या व्यक्ती शहरातील बड्या हस्ती आहेत. यामुळे खळबळ उडाली असून, सिग्नल कॅम्पला हादरा बसला आहे.लातूर इंडस्ट्रीयल स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमण करुन काही लोकांनी रस्ता बंद केला आहे़ या रस्त्यावर काहींनी पक्के घरे बांधली आहेत़ काही लोकांनी शिकवणी वर्गाला ही जागा बांधकाम करुन भाड्याने दिली आहे़ गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेच्या या रस्त्यावर त्यांचे अतिक्रमण आहे़ यासंदर्भात २२ आॅक्टोबर २०१३ रोजी मनपा आयुक्तांकडे मल्लिकार्जून भाईकट्टी यांनी तक्रार केली़ या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत अतिक्रमण केलेल्या १० लोकांना २७ एप्रिल २०१५ रोजी नोटिसा पाठविल्या आहेत़ मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर पक्के /कच्चे बांधकाम त्वरीत काढावे़ अथवा १५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल. स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल़ त्यावर झालेला खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असेही या नोटीसीत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)केनिया मुकुंदराव कवरजी (आर८/४७), केनिया मुकुंदराव कवरजी (आर ८/४६), केनिया कस्तुर बेन (आर ८/४८), सुंदर बेन शांतीलाल शहा (आर ८/४९), प्रेमादेवी रमेशचंद्र भुतडा (आर ८/६९), रामेश्वर रामकिशन भराडिया (आर ८/७१), रमेशचंद्र नारायणदास भुतडा (आर ८/७०), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७३), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७२), स्रेहा असोसियशन (आर ८/७४), इंडस्ट्रील स्टेट सिग्नल कॅम्प, लातूर या दहा जणांना मनपाने नोटिसा बजावल्या आहेत़ इंडस्ट्रील स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी काही ठिकाणी पक्के तर काही ठिकाणी कच्चे बांधकाम केले आहे़ या अतिक्रमण धारकांना तक्रारीनुसार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ तसेच त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे़ त्यांचे म्हणणे असमाधानकारक असेल, तर अतिक्रमण काढण्यात येईल़ परंतु त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़