शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

जिल्हाधिकार्‍यांना ‘त्या’ प्रकरणी दिली नोटीस

By admin | Updated: May 9, 2014 00:39 IST

जिंतूर : कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत़

 जिंतूर : पालिकेतील तेरा कर्मचार्‍यांना स्थायी नियुक्तीचे आदेश देण्यात यावेत, या कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने नांदेड येथील कामगार न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी नोटीस बजावण्यात आल्या आहेत़ जिंतूर पालिकेतील जितेंद्र बाबाराव रोकडे, सुंदर नामदेव खिल्लारे, किशोर कानडे, मैनाबाई कामिठे, मोहनाबाई घनसावंत, दैवशाला साबळे, रामू मोहिते, ग्यानू घनसावंत, दिगंबर घोगरे, कमल कुºहे, काशीबाई बोबडे, प्रयागबाई वाकळे, मथुराबाई घनसावंत यांनी २००८ मध्ये कामगार न्यायालय जालना येथे याचिका दाखल केली़ याचिकेत म्हटले की, आम्ही फिर्यादी १७ ते १८ वर्षांपासून पालिकेत नियमित काम करीत असून, २४० दिवसांपेक्षा जास्त दिवस हजेरी पटावर स्वाक्षर्‍या करून काम केले आहे़ परंतु, पालिकेने आम्हाला कायम केले नाही़ या याचिकेची सुनावणी होऊन २० आॅक्टोबर २०१० ला जालना न्यायालयाने या सर्व कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आदेश दिले़ परंतु, जालना न्यायालयाच्या निर्णयाला पालिका प्रशासनाने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले़ औरंगाबाद खंडपीठाने ३ एप्रिल २०१३ ला जालना कामगार न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला व या कामगारांना कायम करण्याचे आदेश दिले़ परंतु, पालिका व नगरविकास विभागाने या बाबत निर्णय घेतला नाही़ त्यामुळे याचिकाकर्ते जितेंद्र बाबाराव रोकडे यांनी कामगार न्यायालय नांदेड येथे राज्याचे मुख्य सचिव श्रीकांत सिंह, विभागीय आयुक्त संजय कुमार, जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव यांच्याविरूद्ध १५ आॅक्टोबर २०१३ ला अवमान याचिका दाखल केली होती़ या प्रकरणी सुनावणी होऊन वरील सर्वांना न्यायालयाने नोटीसा बजावल्या आहेत़ (वार्ताहर) मागील १७ वर्षांपासून पालिकेत कायम करावे, यासाठी हे १३ कर्मचारी झगडत आहेत़ न्यायालयाने कायम करण्याचा आदेश दिल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर फारशा हालचाली होत नसल्याने अखेर याचिकाकर्त्यांनी अवमान याचिका दाखल केली होती़ अवमान याचिकेनंतर तरी आम्हाला न्याय मिळेल का? या प्रतिक्षेत हे १३ कर्मचारी आहेत़