शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

प्राचार्यपद रद्द करण्यासाठी बदनापूर महाविद्यालयाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:22 IST

बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद्द करण्यासाठी बुधवारी (दि.५) नोटीस पाठविली आहे. या नोटिसीला १० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : प्राध्यापकांच्या निलंबना विरोधात प्रशासनाचे ठोस पाऊल

औरंगाबाद : बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद्द करण्यासाठी बुधवारी (दि.५) नोटीस पाठविली आहे. या नोटिसीला १० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत बामुक्टो संघटनेतर्फे निवडणूक लढविलेले डॉ. शरफोद्दीन शेख यांच्या निवडणूक अर्जावर उपप्राचार्य प्रा. महेश उंडेगावकर यांनी सही केली. यानंतर प्राचार्य डॉ. पाथ्रीकर यांनी महाविद्यालयाचे शिक्के व सही बोगस वापरल्याचा आरोप करून दोघांवर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, तसेच निलंबनही केले. याविरोधात दोघांनी जालना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेत गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली. यात न्यायालयाने प्राध्यापकांची बाजू ग्राह्य धरून गुन्हे रद्द केले. यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकांना रुजू करून घेतले नाही. संस्थेने डॉ. एम.डी. जहागीरदार यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. ही समिती नियमबाह्य असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने समिती रद्द केली. याच कालावधीत उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक आणि विद्यापीठ प्रशासनाने दोन वेळा आदेश देऊन प्राध्यापकांना रुजू करून घेत संपूर्ण वेतन देण्याचे बजावले, तरीही प्राचार्यांची मनमानी कायम राहिल्यामुळे बामुक्टो संघटनेने प्राचार्यांची विद्यापीठ कायद्यातील कलम १३ (च)नुसार पद मान्यता रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे केली. यानुसार विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी (दि.५) प्राचार्यांना नोटीस पाठवली आहे. यात आपले पद रद्द का करण्यात येऊ नये, याचा खुलासा १० डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. यावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर कोणती भूमिका घेतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.प्राध्यापकांवर विनाकारण अन्याय होता कामा नये. न्याय्य बाजू असतानाही निलंबन केले जात असेल, आदेश देऊनही रुजू केले जात नसेल, तर त्याविरोधात विद्यापीठ प्रशासन कडक भूमिका घेत प्राध्यापकांना न्याय देईल.- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू

टॅग्स :collegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठAurangabadऔरंगाबाद