शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

४०० महाविद्यालयांना नोटीस

By admin | Updated: August 10, 2014 02:02 IST

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक महाविद्यालयांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे न पाठविल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.जिल्ह्यातील ५६८ महाविद्यालयांपैकी ४०० महाविद्यालयांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न पाठविल्याने जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांनी मंत्रालयात शिष्यवृत्तीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत हजारो विद्यार्थी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वंचित असल्याचे निदर्शनास आले होते.विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरले असतानाही त्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे पाठविले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल न केल्याने संबंधित महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने अनेक वेळा नोटिसा दिल्या आहेत. महाविद्यालयांनी नोटीसला गांभीर्याने न घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसला आहे. अनेक मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीपासून वंचित असतानाही महाविद्यालयाने बी स्टेटमेंट का दाखल केले नाही, याचा खुलासा तीन दिवसांत करावा अन्यथा महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार महाविद्यालयाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. -संदीप कुलकर्णी, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनामान्यता रद्द करावीमहाविद्यालयांच्या गोंधळाच्या कारभारामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी. शिष्यवृत्तीच्या अपेक्षाने अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. शिष्यवृत्ती न मिळाल्याने गरीब विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. -सचिन निकम, जिल्हा अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना