शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

४०० महाविद्यालयांना नोटीस

By admin | Updated: August 10, 2014 02:02 IST

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक महाविद्यालयांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे न पाठविल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.जिल्ह्यातील ५६८ महाविद्यालयांपैकी ४०० महाविद्यालयांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न पाठविल्याने जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांनी मंत्रालयात शिष्यवृत्तीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत हजारो विद्यार्थी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वंचित असल्याचे निदर्शनास आले होते.विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरले असतानाही त्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे पाठविले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल न केल्याने संबंधित महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने अनेक वेळा नोटिसा दिल्या आहेत. महाविद्यालयांनी नोटीसला गांभीर्याने न घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसला आहे. अनेक मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीपासून वंचित असतानाही महाविद्यालयाने बी स्टेटमेंट का दाखल केले नाही, याचा खुलासा तीन दिवसांत करावा अन्यथा महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार महाविद्यालयाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. -संदीप कुलकर्णी, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनामान्यता रद्द करावीमहाविद्यालयांच्या गोंधळाच्या कारभारामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी. शिष्यवृत्तीच्या अपेक्षाने अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. शिष्यवृत्ती न मिळाल्याने गरीब विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. -सचिन निकम, जिल्हा अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना