शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

४०० महाविद्यालयांना नोटीस

By admin | Updated: August 10, 2014 02:02 IST

शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक महाविद्यालयांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे न पाठविल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न दाखल करणाऱ्या महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.जिल्ह्यातील ५६८ महाविद्यालयांपैकी ४०० महाविद्यालयांनी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव न पाठविल्याने जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सचिवांनी मंत्रालयात शिष्यवृत्तीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत हजारो विद्यार्थी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वंचित असल्याचे निदर्शनास आले होते.विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्तीचे अर्ज भरले असतानाही त्यांचे प्रस्ताव महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे पाठविले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. महाविद्यालयांनी प्रस्ताव दाखल न केल्याने संबंधित महाविद्यालयांना समाजकल्याण विभागाने अनेक वेळा नोटिसा दिल्या आहेत. महाविद्यालयांनी नोटीसला गांभीर्याने न घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक आणि शैक्षणिक फटका बसला आहे. अनेक मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीपासून वंचित असतानाही महाविद्यालयाने बी स्टेटमेंट का दाखल केले नाही, याचा खुलासा तीन दिवसांत करावा अन्यथा महाविद्यालयांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस समाजकल्याण विभागाने महाविद्यालयांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार महाविद्यालयाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत. शासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. -संदीप कुलकर्णी, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनामान्यता रद्द करावीमहाविद्यालयांच्या गोंधळाच्या कारभारामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी. शिष्यवृत्तीच्या अपेक्षाने अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. शिष्यवृत्ती न मिळाल्याने गरीब विद्यार्थी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. -सचिन निकम, जिल्हा अध्यक्ष, रिपब्लिकन विद्यार्थी सेना